दुबई
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत भारतानं ३-० या फरकानं विजय मिळवल्यास भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत 'अव्वल' स्थानी पोहोचण्याची संधी आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात गुरुवारी पहिला सामना नाटिंगम येथे होणार आहे. वनडे क्रमवारीमध्ये इंग्लंड पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात १२, १४ आणि १७ जुलै रोजी सामना होणार आहे. हे तीनही सामने भारतानं जिंकल्यास भारत आयसीसी क्रमवारीत 'टॉप'वर पोहोचेल.
भारतीय संघाला अव्वलस्थानी पोहोचण्याच्या संधीसोबतच खेळाडूंनाही रँकिंग सुधारण्याची संधी आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या ९०९ अंकासह फलंदाजी रँकिंगमध्ये अव्वल आहे तर पाकिस्तानचा बाबर आझम ९०६ अंकासह दुसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजीत टॉप असलेला जसप्रीत बुमराहच्या बोटाला दुखापत झाल्याने तो या मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे इतर गोलंदाजांना अंकात सुधारणा करण्याची संधी मिळू शकणार आहे. तिसऱ्या नंबरवर असलेला हसन अली टॉपवर पोहोचण्याचा प्रयत्न करेल.
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत भारतानं ३-० या फरकानं विजय मिळवल्यास भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत 'अव्वल' स्थानी पोहोचण्याची संधी आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात गुरुवारी पहिला सामना नाटिंगम येथे होणार आहे. वनडे क्रमवारीमध्ये इंग्लंड पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात १२, १४ आणि १७ जुलै रोजी सामना होणार आहे. हे तीनही सामने भारतानं जिंकल्यास भारत आयसीसी क्रमवारीत 'टॉप'वर पोहोचेल.
भारतीय संघाला अव्वलस्थानी पोहोचण्याच्या संधीसोबतच खेळाडूंनाही रँकिंग सुधारण्याची संधी आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या ९०९ अंकासह फलंदाजी रँकिंगमध्ये अव्वल आहे तर पाकिस्तानचा बाबर आझम ९०६ अंकासह दुसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजीत टॉप असलेला जसप्रीत बुमराहच्या बोटाला दुखापत झाल्याने तो या मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे इतर गोलंदाजांना अंकात सुधारणा करण्याची संधी मिळू शकणार आहे. तिसऱ्या नंबरवर असलेला हसन अली टॉपवर पोहोचण्याचा प्रयत्न करेल.