वृत्तसंस्था, नॉर्थ साउंड (अँटिगा)
पहिली वनडे पावसामुळे वाया गेल्यानंतर विंडीज दौऱ्यावर असलेल्या भारताने दुसरी वनडे सहज जिंकली. आज, शुक्रवारी रंगणारी तिसरी वनडे जिंकून मालिकेतील आघाडी २-० अशी वाढवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. आयसीसी रँकिंगमध्ये भारत तिसरा आहे, त्यात अनुभव आणि सूर या दोन्ही मुद्यांवरही भारत हा यजमान विंडीजपेक्षा सरस आहे, यात शंका नाही. मालिकेतील दुसऱ्या वनडेत दोन्ही संघांतील फरक स्पष्ट दिसला होता. भारताने ५ बाद ३१० धावा करून विंडीजला ६ बाद २०५ धावांत रोखले होते. या मालिकेद्वारे खेळाडूंना आणि संघाला आपले रँकिंग उंचावण्याची संधी आहे. त्याचबरोबर आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी आपले संघातील स्थान निश्चित करण्याची संधीही भारताच्या खेळाडूंना आहे. तेव्हा विंडीज दौऱ्यावर मिळणाऱ्या व्यासपिठाचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न भारतीय खेळाडूंनी करायला हवा.
चिंता युवराजची
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीवीराची भूमिका अजिंक्य रहाणेने व्यवस्थित निभावली आहे. शिखर धवन, विराट कोहली फॉर्मात आहेत. चिंता आहे ती युवराजसिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या कामगिरीची. त्यातच अधिक दबाव असणार तो युवराजसिंगवर. युवराज दोन्ही सामन्यांत अपयशी ठरला आहे. अनिर्णित राहिलेल्या सामन्यात युवी अवघ्या चार धावांवर बाद झाला होता. तर दुसऱ्या लढतीत त्याला अवघ्या १४ धावा करता आल्या. मागील तीन वनडेंत त्याला २२, २३* आणि ७ धावा करता आल्या आहेत. तिसऱ्या वन-डेत त्याला डच्चूही मिळू शकतो. असेही तिसऱ्या लढतीत विराट कोहलीने काही बदल करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, महम्मद शमी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. गोलंदाजीत भुवनेश्वरकुमार प्रभावी मारा करीत आहे. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने दुसऱ्या वनडे विंडीजच्या फलंदाजांची फिरकी घेतली होती. या लढतीतही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. २०१९चा वर्ल्डकप डोळ्यासमोर असल्याने प्रत्येक लढतीतील खेळाडूंच्या कामगिरीकडे निवड समितीचे बारीक लक्ष असेल.
दुसरीकडे, विंडीजला सर्व आघाड्यांवर आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे. विंडीजने संघात दोन बदल केले आहेत. कायल होप आणि सुनील अॅम्ब्रिस यांना वनडे पदार्पणाची संधी मिळू शकते. विंडीज संघात कायल होप आणि शाई होप हे बंधू खेळताना दिसतील. होप आणि अॅम्ब्रिस जोनाथन कार्टर आणि के. विल्यम्सची जागा घेतील. अर्थात, विंडीजला कमी लेखून चालणार नाही.
भारत वि. वेस्ट इंडिज
वेळ: संध्याकाळी ६.३०पासून
पहिली वनडे पावसामुळे वाया गेल्यानंतर विंडीज दौऱ्यावर असलेल्या भारताने दुसरी वनडे सहज जिंकली. आज, शुक्रवारी रंगणारी तिसरी वनडे जिंकून मालिकेतील आघाडी २-० अशी वाढवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. आयसीसी रँकिंगमध्ये भारत तिसरा आहे, त्यात अनुभव आणि सूर या दोन्ही मुद्यांवरही भारत हा यजमान विंडीजपेक्षा सरस आहे, यात शंका नाही. मालिकेतील दुसऱ्या वनडेत दोन्ही संघांतील फरक स्पष्ट दिसला होता. भारताने ५ बाद ३१० धावा करून विंडीजला ६ बाद २०५ धावांत रोखले होते. या मालिकेद्वारे खेळाडूंना आणि संघाला आपले रँकिंग उंचावण्याची संधी आहे. त्याचबरोबर आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी आपले संघातील स्थान निश्चित करण्याची संधीही भारताच्या खेळाडूंना आहे. तेव्हा विंडीज दौऱ्यावर मिळणाऱ्या व्यासपिठाचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न भारतीय खेळाडूंनी करायला हवा.
चिंता युवराजची
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीवीराची भूमिका अजिंक्य रहाणेने व्यवस्थित निभावली आहे. शिखर धवन, विराट कोहली फॉर्मात आहेत. चिंता आहे ती युवराजसिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या कामगिरीची. त्यातच अधिक दबाव असणार तो युवराजसिंगवर. युवराज दोन्ही सामन्यांत अपयशी ठरला आहे. अनिर्णित राहिलेल्या सामन्यात युवी अवघ्या चार धावांवर बाद झाला होता. तर दुसऱ्या लढतीत त्याला अवघ्या १४ धावा करता आल्या. मागील तीन वनडेंत त्याला २२, २३* आणि ७ धावा करता आल्या आहेत. तिसऱ्या वन-डेत त्याला डच्चूही मिळू शकतो. असेही तिसऱ्या लढतीत विराट कोहलीने काही बदल करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, महम्मद शमी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. गोलंदाजीत भुवनेश्वरकुमार प्रभावी मारा करीत आहे. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने दुसऱ्या वनडे विंडीजच्या फलंदाजांची फिरकी घेतली होती. या लढतीतही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. २०१९चा वर्ल्डकप डोळ्यासमोर असल्याने प्रत्येक लढतीतील खेळाडूंच्या कामगिरीकडे निवड समितीचे बारीक लक्ष असेल.
दुसरीकडे, विंडीजला सर्व आघाड्यांवर आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे. विंडीजने संघात दोन बदल केले आहेत. कायल होप आणि सुनील अॅम्ब्रिस यांना वनडे पदार्पणाची संधी मिळू शकते. विंडीज संघात कायल होप आणि शाई होप हे बंधू खेळताना दिसतील. होप आणि अॅम्ब्रिस जोनाथन कार्टर आणि के. विल्यम्सची जागा घेतील. अर्थात, विंडीजला कमी लेखून चालणार नाही.
भारत वि. वेस्ट इंडिज
वेळ: संध्याकाळी ६.३०पासून