बर्मिंगहॅम : रोहित शर्माचे वर्ल्डकपमधील चौथे शतक (१०४) आणि के.एल. राहुलची अर्धशतकी खेळी (७७) या जोरावर केलेल्या ९ बाद ३१४ धावांचे आव्हान पेलताना बांगलादेशचा डाव २८६ धावांत आटोपला आणि भारताने वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या विजयामुळे भारत १३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून बांगलादेशचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे. भारताच्या जसप्रीत बूमराहने ४ तर हार्दिक पंड्याने ३ बळी घेत या विजयात मोलाचा हातभार लावला.
भारत उपांत्य फेरीत
रोहित शर्माचे वर्ल्डकपमधील चौथे शतक (१०४) आणि केएल...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jul 2019, 4:00 am