वृत्तसंस्था, क्वालालंपूर
भारताच्या एकोणीस वर्षांखालील संघाला आशिया कप वनडे क्रिकेट स्पर्धेमध्ये नेपाळपाठोपाठ बांगलादेशकडूनही पराभवाचा धक्का बसला. या दोन पराभवांमुळे भारतीय संघाचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले असून, बांगलादेशने साखळीतील तीनही सामने जिंकून दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मलेशियातील क्वालालंपूर येथे ही स्पर्धा सुरू आहे. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे भारत-बांगलादेश सामना प्रत्येकी ३२ षटकांचा खेळवण्यात आला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३२ षटकांत ८ बाद १८७ धावा केल्या. भारताच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकापर्यंत मजल मारता आली नाही. भारताकडून सलमान खानने सर्वाधिक नाबाद ३९ धावांची खेळी केली. बांगलादेशच्या रोबिउल हकने तीन विकेट घेतल्या.
आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. पिनाक घोष आणि महंमद नईम यांनी बांगलादेशला १३ षटकांमध्ये ८२ धावांची सलामी दिली. नईम आणि सैफ हसन बाद झाल्यानंतर घोषने तौहिद हृदयसोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ८३ धावांची भागीदारी रचून २८व्या षटकामध्येच बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. घोषने ७७ चेंडूंमध्ये ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८१ धावा फटकावल्या. तौहिदने ३२ चेंडूंमध्ये २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४८ धावा करून त्याला उपयुक्त साथ दिली. भारताकडून मनदीप सिंगने २ विकेट घेतल्या. या स्पर्धेमध्ये भारताला केवळ मलेशियाविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले.
स्कोअरबोर्डः भारत ३२ षटकांत ८ बाद १८७ (अनुज रावत ३४, सलमान खान नाबाद ३९, हार्विक देसाई २१, रोबिउल हक ३-४३, नईम हसन २-३८) पराभूत विरुद्ध बांगलादेश २८ षटकांत २ बाद १९१ (पिनाक घोष नाबाद ८१, तौहिद हृदय नाबाद ४८, मनदीप सिंग २-३६).
भारताच्या एकोणीस वर्षांखालील संघाला आशिया कप वनडे क्रिकेट स्पर्धेमध्ये नेपाळपाठोपाठ बांगलादेशकडूनही पराभवाचा धक्का बसला. या दोन पराभवांमुळे भारतीय संघाचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले असून, बांगलादेशने साखळीतील तीनही सामने जिंकून दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मलेशियातील क्वालालंपूर येथे ही स्पर्धा सुरू आहे. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे भारत-बांगलादेश सामना प्रत्येकी ३२ षटकांचा खेळवण्यात आला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३२ षटकांत ८ बाद १८७ धावा केल्या. भारताच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकापर्यंत मजल मारता आली नाही. भारताकडून सलमान खानने सर्वाधिक नाबाद ३९ धावांची खेळी केली. बांगलादेशच्या रोबिउल हकने तीन विकेट घेतल्या.
आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. पिनाक घोष आणि महंमद नईम यांनी बांगलादेशला १३ षटकांमध्ये ८२ धावांची सलामी दिली. नईम आणि सैफ हसन बाद झाल्यानंतर घोषने तौहिद हृदयसोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ८३ धावांची भागीदारी रचून २८व्या षटकामध्येच बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. घोषने ७७ चेंडूंमध्ये ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८१ धावा फटकावल्या. तौहिदने ३२ चेंडूंमध्ये २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४८ धावा करून त्याला उपयुक्त साथ दिली. भारताकडून मनदीप सिंगने २ विकेट घेतल्या. या स्पर्धेमध्ये भारताला केवळ मलेशियाविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले.
स्कोअरबोर्डः भारत ३२ षटकांत ८ बाद १८७ (अनुज रावत ३४, सलमान खान नाबाद ३९, हार्विक देसाई २१, रोबिउल हक ३-४३, नईम हसन २-३८) पराभूत विरुद्ध बांगलादेश २८ षटकांत २ बाद १९१ (पिनाक घोष नाबाद ८१, तौहिद हृदय नाबाद ४८, मनदीप सिंग २-३६).