अ‍ॅपशहर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढाईसाठी विराटसेना 'जैसे थे'

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली असून बांगलादेशची दाणादाण उडवणारी विराटसेनाच कांगारूंशी दोन हात करणार आहे. येत्या २३ फेब्रुवारीपासून भारत-ऑस्ट्रेलियातील पहिली कसोटी सुरू होणार आहे.

Maharashtra Times 14 Feb 2017, 1:57 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india retain squad for the first two tests v australia
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढाईसाठी विराटसेना 'जैसे थे'


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली असून बांगलादेशची दाणादाण उडवणारी विराटसेनाच कांगारूंशी दोन हात करणार आहे.

रोहित शर्मा, मोहम्मद शामी आणि फिरकीपटू अमित मिश्रा यांना या संघात स्थान मिळणार का, याबद्दल उत्सुकता होती. परंतु, त्यांना विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीनं घेतला आहे. रिव्हर्स स्विंगमध्ये माहीर असलेल्या शामीची टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध गरज होती. परंतु, तो गुडघ्याच्या दुखापतीतून अजून सावरलेला नाही. मांडीवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर रोहित शर्मानं गेल्या आठवड्यातच सराव सुरू केला आहे. त्यामुळे त्याचा विचार पहिल्या दोन कसोटींसाठी झाला नसल्याचं कळतं. तसंही, मधल्या फळीतील त्याच्या जागेसाठी करुण नायरचा तगडा पर्याय विराट कोहलीला सापडला आहे. चेन्नई कसोटीत नायरनं त्रिशतक ठोकून सगळ्यांनाच सुखद धक्का दिला होता.

येत्या २३ फेब्रुवारीपासून भारत-ऑस्ट्रेलियातील पहिली कसोटी सुरू होणार आहे.

'मिशन ऑस्ट्रेलिया'साठी भारतीय संघ असाः

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, करुण नायर, जयंत यादव, कुपदीप यादव, अभिनव मुकुंद, हार्दिक पंड्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज