वृत्तसंस्था, धरमशाला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतील चौथा व अखेरचा सामना शनिवारपासून धरमशाला येथे सुरू होत आहे. या मालिकेत आतापर्यंत १-१ अशी बरोबरी झाली असल्याने चौथ्या सामन्यास जणू अंतिम सामन्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे दोन्ही संघ या कसोटीसह मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतील. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अद्यापही दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने या कसोटीतील त्याच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह आहे.
या मालिकेतील पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, पाठोपाठ दुसरा सामना जिंकून भारताने १-१ अशी बरोबरी साधली. रांची येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने विजयाची संधी निर्माण केली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाने अखेरच्या दिवशी चिवट खेळ करून कसोटी बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. या मालिकेत पहिल्या कसोटीचा अपवाद सोडल्यास भारताची कामगिरी समाधानकारक झाली आहे.
लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा हे भारतीय फलंदाज चांगल्या फॉर्मात असून वृद्धिमान साहा, मुरली विजय या खेळाडूंनीही तिसऱ्या कसोटीत चांगली फलंदाजी केली. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी गोलंदाजीची धुरा समर्थपणे वाहिली असून त्याला अन्य गोलंदाजांकडूनही चांगली साथ मिळते आहे. धरमशालाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पूरक असल्याने उमेश यादव व इशांत शर्मा यांच्यासह भुवनेश्वरकुमार किंवा महंमद शमी या अतिरिक्त वेगवान गोलंदाजाचा अंतिम संघात समावेश करण्यात येण्याचीही शक्यता आहे. भारताने शेवटच्या क्षणी शमी आणि श्रेयस अय्यरचा संघात समावेश केला आहे.
कोहलीऐवजी अजिंक्य कर्णधार?
कर्णधार विराट कोहलीची दुखापत मात्र भारतीय संघासाठी चिंताजनक ठरू शकते. तिसऱ्या कसोटीदरम्यान खांद्याला झालेल्या दुखापतीतून विराट अद्यापही सावरलेला नाही. चौथ्या कसोटीदरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याची ही दुखापत बळावण्याची शक्यता असल्याने त्याला या कसोटीमध्ये विश्रांती देण्यात येईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात येईल.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघही ही कसोटी जिंकण्यासाठी तितकाच प्रयत्नशील असेल. मिचेल मार्श, मिचेल स्टार्क या खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे त्रस्त असलेल्या ऑस्ट्रेलियाला डेव्हिड वॉर्नरचा खराब फॉर्मही सतावतो आहे. ऑस्ट्रेलियासाठी जमेची बाजू म्हणजे कर्णधार स्टिव्हन स्मिथ हा चांगल्या फॉर्मात असून त्याने मालिकेत आतापर्यंत दोन शतके झळकावलेली आहेत. त्याच्यासोबत पीटर हँड्सकोम्ब, मॅट रेनशॉ, शॉन मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांची कामगिरीही समाधानकारक आहे. चौथ्या कसोटीत कामगिरीत सातत्य ठेवण्यात कोणत्या संघाला यश येते, यावर मालिकेचा निकाल अवलंबून असेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतील चौथा व अखेरचा सामना शनिवारपासून धरमशाला येथे सुरू होत आहे. या मालिकेत आतापर्यंत १-१ अशी बरोबरी झाली असल्याने चौथ्या सामन्यास जणू अंतिम सामन्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे दोन्ही संघ या कसोटीसह मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतील. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अद्यापही दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने या कसोटीतील त्याच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह आहे.
या मालिकेतील पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, पाठोपाठ दुसरा सामना जिंकून भारताने १-१ अशी बरोबरी साधली. रांची येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने विजयाची संधी निर्माण केली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाने अखेरच्या दिवशी चिवट खेळ करून कसोटी बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. या मालिकेत पहिल्या कसोटीचा अपवाद सोडल्यास भारताची कामगिरी समाधानकारक झाली आहे.
लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा हे भारतीय फलंदाज चांगल्या फॉर्मात असून वृद्धिमान साहा, मुरली विजय या खेळाडूंनीही तिसऱ्या कसोटीत चांगली फलंदाजी केली. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी गोलंदाजीची धुरा समर्थपणे वाहिली असून त्याला अन्य गोलंदाजांकडूनही चांगली साथ मिळते आहे. धरमशालाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पूरक असल्याने उमेश यादव व इशांत शर्मा यांच्यासह भुवनेश्वरकुमार किंवा महंमद शमी या अतिरिक्त वेगवान गोलंदाजाचा अंतिम संघात समावेश करण्यात येण्याचीही शक्यता आहे. भारताने शेवटच्या क्षणी शमी आणि श्रेयस अय्यरचा संघात समावेश केला आहे.
कोहलीऐवजी अजिंक्य कर्णधार?
कर्णधार विराट कोहलीची दुखापत मात्र भारतीय संघासाठी चिंताजनक ठरू शकते. तिसऱ्या कसोटीदरम्यान खांद्याला झालेल्या दुखापतीतून विराट अद्यापही सावरलेला नाही. चौथ्या कसोटीदरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याची ही दुखापत बळावण्याची शक्यता असल्याने त्याला या कसोटीमध्ये विश्रांती देण्यात येईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात येईल.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघही ही कसोटी जिंकण्यासाठी तितकाच प्रयत्नशील असेल. मिचेल मार्श, मिचेल स्टार्क या खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे त्रस्त असलेल्या ऑस्ट्रेलियाला डेव्हिड वॉर्नरचा खराब फॉर्मही सतावतो आहे. ऑस्ट्रेलियासाठी जमेची बाजू म्हणजे कर्णधार स्टिव्हन स्मिथ हा चांगल्या फॉर्मात असून त्याने मालिकेत आतापर्यंत दोन शतके झळकावलेली आहेत. त्याच्यासोबत पीटर हँड्सकोम्ब, मॅट रेनशॉ, शॉन मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांची कामगिरीही समाधानकारक आहे. चौथ्या कसोटीत कामगिरीत सातत्य ठेवण्यात कोणत्या संघाला यश येते, यावर मालिकेचा निकाल अवलंबून असेल.