नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यातील अंतिम सामन्यासह भारताने आज मालिकाही गमावली. ऑस्ट्रेलियाने मालिकेतील अंतिम सामन्यात भारतावर ३५ धावांनी मात करत मालिकाही ३-२ने खिशात घातली. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने दहा वर्षानंतर भारतात वनडे सीरिज जिंकली आहे.
मालिकेच्या पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाची शतकी खेळी आणि पीटर हँड्सकोम्बच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २७२ धावा केल्या. पण नंतर फलंदाजीला आलेल्या भारताला २७३ धावांचं लक्ष्य गाठताना अक्षरश: घाम गाळावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघ टीकू शकला नाही. टीम इंडियाला २३७ धावांवर रोखण्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश आलं आणि त्यांनी मालिका खिशात घातली.
२७३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. पाचवं षटक सुरू असताना शिखर धवन अवघ्या १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीही २० धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने चांगली सुरुवात केली. पण त्यालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. १६ धावांवर खेळत असताना नॅथन लिओनच्या चेंडूवर तो बाद झाला. विजय शंकरही १८ धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताची स्थिती १२० धावांवर ४ बाद अशी झाली होती. याचवेळी मैदानावर टिकून असलेल्या रोहित शर्माने वनडे करिअरमधील ८ हजार धावांचा पल्ला गाठला.
भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक ५६ धावा केल्या. त्यात चार चौकारांचा समावेश आहे. त्याखालोखाल भुवनेश्वर कुमाराने ४६ आणि केदार जाधवने ४४ धावा केल्या. या जोडीने सातव्या विकेटसाठी ९१ धावांची भागिदारी केली. या दोघांनीही भारताला जिंकून देण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलं नाही.
ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात
नाणेफेक जिंकून मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची त्या मानाने दमदार सुरुवात झाली होती. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि अॅरन फिंच यांनी मैदानावर उतरताच धडाकेबाज सुरुवात केली. पहिल्या सहा ओव्हरमध्ये एकही गडी न गमावता ऑस्ट्रेलियाने ३८ धावा केल्या. खासकरून ख्वाजाने आक्रमक खेळी करत धाव संख्या वाढवण्याचा सपाटा लावला होता. त्याने भुवनेश्वरच्या पहिल्याच षटकामध्ये चौकार लगावून खातं खोललं. भुवीच्या तिसऱ्या षटकामध्ये ख्वाजा आणि फिंचने प्रत्येकी एक-एक चौकार लगावत एकूण दहा धावा ठोकल्या. सातव्या षटकानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने जसप्रीत बुमराहकडे चेंडू दिला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला लगाम लागला. मात्र ही जोडी दहाव्या षटकापर्यंत मैदानावर तळ ठोकून होती.
ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १७२ असताना उस्मान ख्वाजाला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. तो शंभर धावांवर बाद झाला. ख्वाजा आणि फिंच या जोडीने ७६ धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर मात्र भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या रोखण्यात यश मिळवलं होतं.
स्कोअरकार्ड पाहण्यासाठी क्लिक करा:
मालिकेच्या पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाची शतकी खेळी आणि पीटर हँड्सकोम्बच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २७२ धावा केल्या. पण नंतर फलंदाजीला आलेल्या भारताला २७३ धावांचं लक्ष्य गाठताना अक्षरश: घाम गाळावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघ टीकू शकला नाही. टीम इंडियाला २३७ धावांवर रोखण्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश आलं आणि त्यांनी मालिका खिशात घातली.
२७३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. पाचवं षटक सुरू असताना शिखर धवन अवघ्या १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीही २० धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने चांगली सुरुवात केली. पण त्यालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. १६ धावांवर खेळत असताना नॅथन लिओनच्या चेंडूवर तो बाद झाला. विजय शंकरही १८ धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताची स्थिती १२० धावांवर ४ बाद अशी झाली होती. याचवेळी मैदानावर टिकून असलेल्या रोहित शर्माने वनडे करिअरमधील ८ हजार धावांचा पल्ला गाठला.
भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक ५६ धावा केल्या. त्यात चार चौकारांचा समावेश आहे. त्याखालोखाल भुवनेश्वर कुमाराने ४६ आणि केदार जाधवने ४४ धावा केल्या. या जोडीने सातव्या विकेटसाठी ९१ धावांची भागिदारी केली. या दोघांनीही भारताला जिंकून देण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलं नाही.
ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात
नाणेफेक जिंकून मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची त्या मानाने दमदार सुरुवात झाली होती. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि अॅरन फिंच यांनी मैदानावर उतरताच धडाकेबाज सुरुवात केली. पहिल्या सहा ओव्हरमध्ये एकही गडी न गमावता ऑस्ट्रेलियाने ३८ धावा केल्या. खासकरून ख्वाजाने आक्रमक खेळी करत धाव संख्या वाढवण्याचा सपाटा लावला होता. त्याने भुवनेश्वरच्या पहिल्याच षटकामध्ये चौकार लगावून खातं खोललं. भुवीच्या तिसऱ्या षटकामध्ये ख्वाजा आणि फिंचने प्रत्येकी एक-एक चौकार लगावत एकूण दहा धावा ठोकल्या. सातव्या षटकानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने जसप्रीत बुमराहकडे चेंडू दिला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला लगाम लागला. मात्र ही जोडी दहाव्या षटकापर्यंत मैदानावर तळ ठोकून होती.
ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १७२ असताना उस्मान ख्वाजाला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. तो शंभर धावांवर बाद झाला. ख्वाजा आणि फिंच या जोडीने ७६ धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर मात्र भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या रोखण्यात यश मिळवलं होतं.
स्कोअरकार्ड पाहण्यासाठी क्लिक करा: