सिडनीः
भारताकडे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट जलदगती गोलंदाज असून, त्यांची गोलंदाजी आक्रमक आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर त्यांचं तगडं आव्हान आहे, असं मत ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज ज्योफ लॉसन यानं व्यक्त केलं.
भारतीय संघात सर्वोत्तम कामगिरी करणारे जलदगती गोलंदाज आणि उत्तम फिरकीपटूही आहेत. ईशांत शर्मा, उमेश यादव चांगलं प्रदर्शन करीत आहेत. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्याकडे स्विंग करण्याची वेगळी क्षमता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर सलामी जलदगती गोलंदाजांचं मोठं आव्हान असणार आहे, असं त्यानं सांगितलं.
भारतीय संघ चार जलदगती गोलंदाजांसह मैदानात उतरणार नाही. तीन जलदगती आणि एक किंवा दोन फिरकीपटूंचा समावेश अंतिम संघात असेल. एडलेडमध्ये कसोटी मालिकेला होणार आहे. ही बाबा भारतासाठी फायदेशीर आहे, असं त्यानं नमूद केलं.
भारताकडे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट जलदगती गोलंदाज असून, त्यांची गोलंदाजी आक्रमक आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर त्यांचं तगडं आव्हान आहे, असं मत ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज ज्योफ लॉसन यानं व्यक्त केलं.
भारतीय संघात सर्वोत्तम कामगिरी करणारे जलदगती गोलंदाज आणि उत्तम फिरकीपटूही आहेत. ईशांत शर्मा, उमेश यादव चांगलं प्रदर्शन करीत आहेत. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्याकडे स्विंग करण्याची वेगळी क्षमता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर सलामी जलदगती गोलंदाजांचं मोठं आव्हान असणार आहे, असं त्यानं सांगितलं.
भारतीय संघ चार जलदगती गोलंदाजांसह मैदानात उतरणार नाही. तीन जलदगती आणि एक किंवा दोन फिरकीपटूंचा समावेश अंतिम संघात असेल. एडलेडमध्ये कसोटी मालिकेला होणार आहे. ही बाबा भारतासाठी फायदेशीर आहे, असं त्यानं नमूद केलं.