अ‍ॅपशहर

भारतापुढे विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य

भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लंडचा दुसरा डाव १८० धावांत गुंडाळला असून भारताला विजयासाठी १९४ धावांची गरज आहे. संयमी फलंदाजी केल्यास मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडी घेण्याची संधी भारताला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Aug 2018, 9:46 pm
बर्मिंगहॅम :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ishant


भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लंडचा दुसरा डाव १८० धावांत गुंडाळला असून भारताला विजयासाठी १९४ धावांची गरज आहे. संयमी फलंदाजी केल्यास मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडी घेण्याची संधी भारताला आहे.

एजबस्टन कसोटीत पहिल्या डावात २८७ धावा करणाऱ्या यजमान इंग्लंडची दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजीपुढे दाणादाण उडाली. एकवेळ ७ बाद ८७ अशी दयनीय अवस्था इंग्लंडची झाली होती. मात्र, इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी सुरेख फलंदाजी केली. सॅम कुर्रनने ६३ धावांची अर्धशतकी खेळी करत आदिल रशीद आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या साथीने इंग्लंडची धावसंख्या १८० पर्यंत नेली.

इशांत शर्माने अचूक मारा करत ५ बळी टिपले. पहिल्या डावात इंग्लंडला ४ धक्के देणाऱ्या रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावातही आपल्या फिरकीची जादू दाखवत इंग्लंडच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. उमेश यादवने २ बळी टिपले.

दरम्यान, इंग्लंडने दिलेल्या १९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला १९ धावांवर मुरली विजयाच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे.

भारत वि. इंग्लंड कसोटीचे स्कोअरकार्ड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज