वृत्तसंस्था, लंडन
इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटीत मार खाणाऱ्या भारताला तिसऱ्या कसोटीत नवी आशा दिसू लागली आहे ती संघात जसप्रीत बूमराहचा समावेश होणार असल्यामुळे. भारताचा वेगवान गोलंदाज बूमराह तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नॉटिंगहॅम येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध असेल.
जूनमध्ये डब्लिनला झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात बूमराहच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पहिल्या दोन कसोटीत खेळता आले नाही. टी-२०, वन-डे मालिकेतही तो खेळू शकला नाही.
त्याच्या हातावर लीड्स येथे ४ जुलैला शस्त्रक्रिया करण्यात आली आणि नंतर तो भारतात दुखापतीतून सावरण्यासाठी मेहनत घेत होता. कसोटीसाठी मात्र त्याचा संघात समावेश करण्यात आला.
कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात तो खेळला नसला तरी नेटमध्ये त्याचा सराव सुरू होता. चेम्सफोर्ड, बर्मिंगहॅम, लॉर्डस याठिकाणी त्याचा सराव सुरू होता; पण हाताला करण्यात आलेले प्लॅस्टर काढण्यात आले नव्हते. दुसऱ्या कसोटीदरम्यान नेटमध्ये त्याने प्लॅस्टर काढल्यानंतर सराव केला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात तो उपलब्ध आहे, याची खात्री पटली. पण, आता अंतिम ११ खेळाडूंत त्याला स्थान मिळते का ते पाहायचे.
रविचंद्रन अश्विन आणि हार्दिक पंड्या हे दोघेही तंदुरुस्त आहेत, असे संघव्यवस्थापनाने कळविले आहे. लॉर्ड्सला फलंदाजी करताना दोघांच्याही उजव्या हाताला चेंडू लागल्याने दुखापत झाली होती; पण त्यातून ते सावरले आहेत.
भारताचा कर्णधार विराट कोहली मात्र तिसऱ्या कसोटीत तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतीय संघाने मंगळवारी पूर्णवेळ जिममध्ये घालवला. विराटसह सर्व खेळाडू तंदुरुस्तीसाठी जय्यत तयारी करत असल्याचे दिसले.
इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटीत मार खाणाऱ्या भारताला तिसऱ्या कसोटीत नवी आशा दिसू लागली आहे ती संघात जसप्रीत बूमराहचा समावेश होणार असल्यामुळे. भारताचा वेगवान गोलंदाज बूमराह तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नॉटिंगहॅम येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध असेल.
जूनमध्ये डब्लिनला झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात बूमराहच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पहिल्या दोन कसोटीत खेळता आले नाही. टी-२०, वन-डे मालिकेतही तो खेळू शकला नाही.
त्याच्या हातावर लीड्स येथे ४ जुलैला शस्त्रक्रिया करण्यात आली आणि नंतर तो भारतात दुखापतीतून सावरण्यासाठी मेहनत घेत होता. कसोटीसाठी मात्र त्याचा संघात समावेश करण्यात आला.
कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात तो खेळला नसला तरी नेटमध्ये त्याचा सराव सुरू होता. चेम्सफोर्ड, बर्मिंगहॅम, लॉर्डस याठिकाणी त्याचा सराव सुरू होता; पण हाताला करण्यात आलेले प्लॅस्टर काढण्यात आले नव्हते. दुसऱ्या कसोटीदरम्यान नेटमध्ये त्याने प्लॅस्टर काढल्यानंतर सराव केला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात तो उपलब्ध आहे, याची खात्री पटली. पण, आता अंतिम ११ खेळाडूंत त्याला स्थान मिळते का ते पाहायचे.
रविचंद्रन अश्विन आणि हार्दिक पंड्या हे दोघेही तंदुरुस्त आहेत, असे संघव्यवस्थापनाने कळविले आहे. लॉर्ड्सला फलंदाजी करताना दोघांच्याही उजव्या हाताला चेंडू लागल्याने दुखापत झाली होती; पण त्यातून ते सावरले आहेत.
भारताचा कर्णधार विराट कोहली मात्र तिसऱ्या कसोटीत तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतीय संघाने मंगळवारी पूर्णवेळ जिममध्ये घालवला. विराटसह सर्व खेळाडू तंदुरुस्तीसाठी जय्यत तयारी करत असल्याचे दिसले.