अ‍ॅपशहर

मोहालीत भारताचा ८ गडी राखून विजय

मोहालीत झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर ८ गडी राखून आज दणदणीत विजय मिळवला. चौथ्या दिवशीच सामना जिंकून भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने २० ओव्हरमध्येच दोन गडी गमवत १०४ पूर्ण केल्या.

Maharashtra Times 29 Nov 2016, 4:28 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मोहाली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india vs england mohali test india won by 8 wickets in mohali test
मोहालीत भारताचा ८ गडी राखून विजय


मोहालीत झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर ८ गडी राखून आज दणदणीत विजय मिळवला. चौथ्या दिवशीच सामना जिंकून भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

स्कोअरकार्ड

सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात हसीब हमीद वगळता इंग्लंडचे खेळाडू फारसे खेळपट्टीवर टिकू शकले नाही. आर. अश्वीनने तीन तर रवींद्र जडेजा, जयंत यादव आणि मोहमद शामी यांनी इंग्लंडचे प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केली. यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव २३६ धावांवरच गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. इंग्लंडने १०३ धावांची आघाडी घेतली होती.

भारताने २० ओव्हरमध्येच दोन गडी गमवत १०४ पूर्ण केल्या. दुसऱ्या डावात पार्थीव पटेलने सर्वाधिक ६७ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा २५ धावांवर आणि मुरली विजय शून्यावर बाद झाला. तर कर्णधार विराट कोहली ६ धावांवर खेळत होता.

इंग्लंडने पहिल्या डावात २८३ धावा केल्या होत्या. याला उत्तर देताना अर्धशतकवीर अश्विनने जडेजासह केलेल्या भागीदारीमुळे भारताने पहिल्या डावात ४१७ धावांपर्यंत मजल मारत १३४ धावांची आघाडी घेतली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज