मटा ऑनलाइन वृत्त | इंदूर
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करून विजयाचे सोने लुटले. इंदूर येथे झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ३२१ धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने ३ सामन्यांच्या मालिकेत ३-० असा विजय मिळवला. कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, आर.आश्विन आणि रवींद्र जडेजा हे भारतीय विजयाचे शिल्पकार ठरले. सामन्यात १३ तर संपूर्ण मालिकेत ३० विकेट घेणाऱ्या आश्विनला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. भारतीय संघाचा कसोटीमधील हा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
संपूर्ण स्कोअरकार्ड पाहा
होळकर क्रिकेट स्टेडियवर झालेल्या सामन्यात भारताने दुसरा डाव २१६ धावांवर घोषीत केला. पहिल्या डावात भारताने २५८ धावांची आघाडी घेतल्यामुळे न्यूझीलंडपुढे विजयासाठी ४७५ धावांचे लक्ष्य होते. पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती. मात्र आश्विन आणि जडेजा जोडीच्या फिरकी गोलंदाजीपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. भारतीय संघाने केवळ ४४.५ षटकात १५३ धावात न्यूझीलंडवर विजय मिळवला. आश्विनने कसोटीमधील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्याने दुसऱ्या डावात केवळ ५९ धावात ७ गडी बाद केले. तर जडेजाने २ गडी बाद केले.
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करून विजयाचे सोने लुटले. इंदूर येथे झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ३२१ धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने ३ सामन्यांच्या मालिकेत ३-० असा विजय मिळवला. कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, आर.आश्विन आणि रवींद्र जडेजा हे भारतीय विजयाचे शिल्पकार ठरले. सामन्यात १३ तर संपूर्ण मालिकेत ३० विकेट घेणाऱ्या आश्विनला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. भारतीय संघाचा कसोटीमधील हा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
संपूर्ण स्कोअरकार्ड पाहा
होळकर क्रिकेट स्टेडियवर झालेल्या सामन्यात भारताने दुसरा डाव २१६ धावांवर घोषीत केला. पहिल्या डावात भारताने २५८ धावांची आघाडी घेतल्यामुळे न्यूझीलंडपुढे विजयासाठी ४७५ धावांचे लक्ष्य होते. पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती. मात्र आश्विन आणि जडेजा जोडीच्या फिरकी गोलंदाजीपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. भारतीय संघाने केवळ ४४.५ षटकात १५३ धावात न्यूझीलंडवर विजय मिळवला. आश्विनने कसोटीमधील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्याने दुसऱ्या डावात केवळ ५९ धावात ७ गडी बाद केले. तर जडेजाने २ गडी बाद केले.