मँचेस्टर:
वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत पाच शतकं ठोकणारा टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मावर सध्या सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. रोहित हा एकदिवसीय क्रिकेटमधील महान खेळाडू आहे, असं ते म्हणाले. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. एकूण आठपैकी सात सामने जिंकले आहेत. तर एक सामना पावसामुळं रद्द झाला आहे. टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पराभूत झाली आहे. त्यावरही शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या सामन्यात संघाची कामगिरी चांगली झाली होती, मात्र, नशीब त्यांच्यासोबत होते. मला वाटतंय की त्या दिवशी देव इंग्लंड संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये बसला होता. पुढच्या वेळी इंग्लंडविरुद्ध लढत झाली तर देवानं आमच्या ड्रेसिंग रुममध्ये बसावं. चिंतेचं कोणतंही कारण नाही, असं शास्त्री म्हणाले.
या स्पर्धेत रोहितनं धावा केल्या नसत्या तरी तो एकदिवसीय क्रिकेटमधील महान खेळाडू आहे. गेल्या काही वर्षांतील त्याचे विक्रम पाहू शकता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके ठोकली आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याचं कामगिरीतील सातत्य अचंबित करणारं आहे, असंही शास्त्री यांनी सांगितलं.
वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत पाच शतकं ठोकणारा टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मावर सध्या सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. रोहित हा एकदिवसीय क्रिकेटमधील महान खेळाडू आहे, असं ते म्हणाले.
या स्पर्धेत रोहितनं धावा केल्या नसत्या तरी तो एकदिवसीय क्रिकेटमधील महान खेळाडू आहे. गेल्या काही वर्षांतील त्याचे विक्रम पाहू शकता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके ठोकली आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याचं कामगिरीतील सातत्य अचंबित करणारं आहे, असंही शास्त्री यांनी सांगितलं.