अ‍ॅपशहर

आम्ही विजयाचे दावेदार नव्हतोच: विराट कोहली

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग तीन वन-डे सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला चौथ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीनं प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही विजयाचे दावेदार नव्हतोच, असं तो म्हणाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Feb 2018, 3:16 pm
जोहान्सबर्ग:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat-kohli


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग तीन वन-डे सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला चौथ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीनं प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही विजयाचे दावेदार नव्हतोच, असं तो म्हणाला.

दक्षिण आफ्रिकेनं चौथ्या सामन्यात टीम इंडियाचा विजयी रथ रोखला. चौथ्या सामन्यात आम्ही विजयाचे दावेदार नव्हतोच. ही लढत टी-२० सारखीच झाली. आम्ही अनेक संधी गमावल्या. त्यामुळेच पराभव झाला, असं कोहली म्हणाला.

दरम्यान, टीम इंडियानं पहिली फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद २८९ धावा केल्या होत्या. पावसाच्या व्यत्ययामुळं दक्षिण आफ्रिकेला २८ षटकांत २०२ धावांचं लक्ष्य देण्यात आलं. ते दक्षिण आफ्रिकेनं ५ गड्यांच्या मोबदल्यात गाठलं. यजमान संघाकडून क्लासेनने नाबाद ४३, तर मिलरनं ३९ धावा केल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज