वृत्तसंस्था, तिरुवनंपूरम
पुणे वनडेमध्ये वेस्ट इंडिजने भारताचा कर्णधार विराट कोहलीचे शतक निष्फळ ठरवत सामना जिंकला होता; पण ब्रेबर्नवर पार पडलेल्या चौथ्या वनडेत भारताने विंडीजचा फडशा पाडलाच. पुन्हा येरे माझ्या मागल्या... बरे त्या लढतीत विराट कोहलीला झटपट बाद करण्यात विंडीजला यश आले होते; पण अनपेक्षित शतकी कामगिरी करत चौथ्या क्रमांकावरील अम्बटी रायुडूने रोहित शर्माला साथ देत भारताला विजयश्री मिळवून दिली. आज, तिरवनंतपूरम येथे मालिकेतील निर्णायक वनडे रंगते आहे. यात कुणाची सरशी होते ते बघणे रंजक ठरेल. भारताने लढत गमावली तर मालिका २-२ अशी बरोबरीत सुटेल, अन् भारताने तिरुवनंतपूरम वनडे जिंकली, तर मालिकेत भारताची ३-१ अशी सरशी होईल. दुसऱ्या विशाखापट्टणम वनडेत बरोबरी झाली होती.
-धोनीवर लक्ष कायम
३७ वर्षांच्या महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीवर लक्ष असेलच. गेल्या ब्रेबर्न वनडेत त्याच्या फटकेबाजीची झलक दिसली होती. खरेतर धोनीच्या यष्टीरक्षणाच्या कौशल्याविषयी दुमत नाहीच. यष्टीरक्षणातील त्याची चपळता, हुशारी सारे लाजवाबच आहे, गरज आहे ती त्याने फलंदाजीत अपेक्षित कामगिरी करण्याची. असे नाही की, धोनीच्या 'मॅचविनिंग' खेळी अलीकडे झालेल्याच नाहीत. यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीच्या उपयुक्त खेळी बघायला मिळाल्या आहेत. तेव्हा विंडीजविरुद्धच्या निर्णायक वनडेत त्याची पुनरावृत्ती बघायला मिळाली तर टीम इंडियासाठी सोन्याहून पिवळे असेल....
-खलिलवर जबाबदारी
वर्ल्डकपच्या 'प्लान'मध्ये आपला समावेश एवढ्या तडकाफडकी का झाला आहे, हे खलिल मोहम्मदने विंडीजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये दाखवून दिले. ब्रेबर्नवर पार पडलेल्या या वनडेमध्ये तो सातत्याने चेंडू स्विंग करत होता. त्याच्या माऱ्यात सातत्य आहेच; पण आपल्या डावखुऱ्या माऱ्यात खलिल असे काही खास करून जातो की चेंडूला जास्त वेग मिळतो. मुंबई वनडेमध्ये त्याने सॅम्युएल्सला ज्यापद्धतीने बाद केले होते, ते दर्दी क्रिकेटप्रेमीला नक्कीच सुखावणारे होते. त्याने शिमरॉन हिटमायेर आणि रोव्हमॅन पॉव्हेलचा बचावही असाच मोडून काढला होता.
-खबर संघांची
भारतः अष्टपैलू हार्दिक पंड्या जायबंदी असल्याने फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही गरजा भरून काढण्यासाठी भारतीय संघव्यवस्थापनाने गेल्या ब्रेबर्नवरील लढतीत युझवेंद्र चहलऐवजी रवींद्र जाडेजाला संधी दिली होती. तिरुवनंतपूरमलाही भारतीय संघ याच निर्णायावर कायम राहील असे दिसते आहे.
वेस्ट इंडिजः पाहुणा वेस्ट इंडिज संघ सुनील अम्ब्रिसला संधी देण्याची शक्यता आहे. गोलंदाजीत ते फॅबीन अॅलेनऐवजी अनुभवात पुढे असलेल्या देवेंद्र बिशूला संधी देतील असा अंदाज आहे.
-स्टेडियमची खबर
या भारत-विंडीज वनडेच्या निमित्ताने ग्रीनफील्ड स्टेडियमवर प्रथमच आंतरराष्ट्रीय वनडेचे आयोजन होते आहे. गेल्यावर्षी येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० पार पडली होती. सध्या तिरुवनंतपूरममध्ये उष्णता खूप असेल, त्यामुळे खेळपट्टी पाटा आणि कोरडी असेल.
-संघांचे म्हणणे
'खलीलचा उत्साह, जोश मस्तच आहे. या मुलामध्ये गुणवत्ता आहे, कौशल्य आहे, ज्याचा वापर करत तो आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवू शकतो'
बी अरुण (गोलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाज)
'तिरुवनंतपूरमला उष्ण वातावरण आहे. मैदानही छान आहे, तेव्हा या लढतीसाठी आम्ही उत्सुक आहोत. खेळपट्टीही स्पोर्टिंग असेल'
निक पोथास (क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक, विंडीज)
दृष्टिक्षेप
१)ऑटोबर २०१६नंतर कोणत्याही पाहुण्या संघाला एकाच मालिकेत यजमान भारताला दोनवेळा हरवणे जमलेले नाही.
२)वनडेत दहा हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी धोनीला एका धावेची आवश्यकता आहे. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि विराट कोहलीनंतर अशी कामगिरी करणारा तो पाचवा फलंदाज ठरेल.
३)भुवनेश्वरकुमारला वनडेत शंभर विकेट्ससाठी दोन विकेट्सची आवश्यकता आहे.
पुणे वनडेमध्ये वेस्ट इंडिजने भारताचा कर्णधार विराट कोहलीचे शतक निष्फळ ठरवत सामना जिंकला होता; पण ब्रेबर्नवर पार पडलेल्या चौथ्या वनडेत भारताने विंडीजचा फडशा पाडलाच. पुन्हा येरे माझ्या मागल्या... बरे त्या लढतीत विराट कोहलीला झटपट बाद करण्यात विंडीजला यश आले होते; पण अनपेक्षित शतकी कामगिरी करत चौथ्या क्रमांकावरील अम्बटी रायुडूने रोहित शर्माला साथ देत भारताला विजयश्री मिळवून दिली. आज, तिरवनंतपूरम येथे मालिकेतील निर्णायक वनडे रंगते आहे. यात कुणाची सरशी होते ते बघणे रंजक ठरेल. भारताने लढत गमावली तर मालिका २-२ अशी बरोबरीत सुटेल, अन् भारताने तिरुवनंतपूरम वनडे जिंकली, तर मालिकेत भारताची ३-१ अशी सरशी होईल. दुसऱ्या विशाखापट्टणम वनडेत बरोबरी झाली होती.
-धोनीवर लक्ष कायम
३७ वर्षांच्या महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीवर लक्ष असेलच. गेल्या ब्रेबर्न वनडेत त्याच्या फटकेबाजीची झलक दिसली होती. खरेतर धोनीच्या यष्टीरक्षणाच्या कौशल्याविषयी दुमत नाहीच. यष्टीरक्षणातील त्याची चपळता, हुशारी सारे लाजवाबच आहे, गरज आहे ती त्याने फलंदाजीत अपेक्षित कामगिरी करण्याची. असे नाही की, धोनीच्या 'मॅचविनिंग' खेळी अलीकडे झालेल्याच नाहीत. यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीच्या उपयुक्त खेळी बघायला मिळाल्या आहेत. तेव्हा विंडीजविरुद्धच्या निर्णायक वनडेत त्याची पुनरावृत्ती बघायला मिळाली तर टीम इंडियासाठी सोन्याहून पिवळे असेल....
-खलिलवर जबाबदारी
वर्ल्डकपच्या 'प्लान'मध्ये आपला समावेश एवढ्या तडकाफडकी का झाला आहे, हे खलिल मोहम्मदने विंडीजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये दाखवून दिले. ब्रेबर्नवर पार पडलेल्या या वनडेमध्ये तो सातत्याने चेंडू स्विंग करत होता. त्याच्या माऱ्यात सातत्य आहेच; पण आपल्या डावखुऱ्या माऱ्यात खलिल असे काही खास करून जातो की चेंडूला जास्त वेग मिळतो. मुंबई वनडेमध्ये त्याने सॅम्युएल्सला ज्यापद्धतीने बाद केले होते, ते दर्दी क्रिकेटप्रेमीला नक्कीच सुखावणारे होते. त्याने शिमरॉन हिटमायेर आणि रोव्हमॅन पॉव्हेलचा बचावही असाच मोडून काढला होता.
-खबर संघांची
भारतः अष्टपैलू हार्दिक पंड्या जायबंदी असल्याने फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही गरजा भरून काढण्यासाठी भारतीय संघव्यवस्थापनाने गेल्या ब्रेबर्नवरील लढतीत युझवेंद्र चहलऐवजी रवींद्र जाडेजाला संधी दिली होती. तिरुवनंतपूरमलाही भारतीय संघ याच निर्णायावर कायम राहील असे दिसते आहे.
वेस्ट इंडिजः पाहुणा वेस्ट इंडिज संघ सुनील अम्ब्रिसला संधी देण्याची शक्यता आहे. गोलंदाजीत ते फॅबीन अॅलेनऐवजी अनुभवात पुढे असलेल्या देवेंद्र बिशूला संधी देतील असा अंदाज आहे.
-स्टेडियमची खबर
या भारत-विंडीज वनडेच्या निमित्ताने ग्रीनफील्ड स्टेडियमवर प्रथमच आंतरराष्ट्रीय वनडेचे आयोजन होते आहे. गेल्यावर्षी येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० पार पडली होती. सध्या तिरुवनंतपूरममध्ये उष्णता खूप असेल, त्यामुळे खेळपट्टी पाटा आणि कोरडी असेल.
-संघांचे म्हणणे
'खलीलचा उत्साह, जोश मस्तच आहे. या मुलामध्ये गुणवत्ता आहे, कौशल्य आहे, ज्याचा वापर करत तो आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवू शकतो'
बी अरुण (गोलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाज)
'तिरुवनंतपूरमला उष्ण वातावरण आहे. मैदानही छान आहे, तेव्हा या लढतीसाठी आम्ही उत्सुक आहोत. खेळपट्टीही स्पोर्टिंग असेल'
निक पोथास (क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक, विंडीज)
दृष्टिक्षेप
१)ऑटोबर २०१६नंतर कोणत्याही पाहुण्या संघाला एकाच मालिकेत यजमान भारताला दोनवेळा हरवणे जमलेले नाही.
२)वनडेत दहा हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी धोनीला एका धावेची आवश्यकता आहे. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि विराट कोहलीनंतर अशी कामगिरी करणारा तो पाचवा फलंदाज ठरेल.
३)भुवनेश्वरकुमारला वनडेत शंभर विकेट्ससाठी दोन विकेट्सची आवश्यकता आहे.