विंडीजविरुद्धच्या पहिल्या दोन वनडेंसाठी टीम इंडियाची निवड
वृत्तसंस्था, हैदराबाद
तरुणतडफदार यष्टीरक्षक, फलंदाज ऋषभ पंतची भारताच्या वनडे संघातही निवड करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन लढतींसाठी गुरुवारी भारतीय संघाची घोषणा झाली असून भविष्याची तजवीज म्हणून पंतचा समावेश करण्यात आला आहे. पुढील वर्षी रंगणाऱ्या वनडे वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिने भारतीय संघासाठी यष्टीरक्षकाची जडणघडण करण्यात येत असून पंतची निवड त्याचाच एक भाग समजली जाते आहे.
इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत ११४, तर विंडीजविरुद्धच्या राजकोट कसोटीत ९२ धावा करणारा पंत आता कुठे वीस वर्षांचा आहे. त्यामुळे सातत्याचा अभाव असलेल्या अनुभवी दिनेश कार्तिकऐवजी त्याला पसंती देण्यात आली आहे. सध्या तरी धोनी भारतीय संघात आहे, तेव्हा पंत हा तज्ज्ञ फलंदाज म्हणून संघात खेळणार का? या प्रश्नावर निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणतात, 'हो, अर्थातच; पण गरज भासल्यास तो यष्टीरक्षण करेलही. यात काहीच शंका नाही, की धोनी हा आपला पहिल्या क्रमांकाचा यष्टीरक्षक आहे. मात्र भविष्याचा विचार करता, अतिरिक्त यष्टीरक्षकाची सोय करून ठेवण्यात येते आहे. त्याच दृष्टिकोनातून आम्ही आधी दिनेश कार्तिकला संधी दिली आणि आता ऋषभ पंतला संधी दिली जाते आहे. या दोघांची कामगिरी बघून आम्ही पुढे एकाची निवड करू', असे प्रसाद म्हणाले.
-शमीचे पुनरागमन
तेज गोलंदाज मोहम्मद शमी अखेरची वनडे खेळला होता ती गेल्यावर्षी सप्टेंबरात. विंडीजविरुद्धच्या वनडेत त्याचे पुनरागमन झाले आहे. तिसरा तेज गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते आहे. 'वर्ल्डकपआधी भारताला फक्त १८ वनडे मिळणार आहेत. १९वी वनडे ही भारताची पहिली वर्ल्डकप लढत असेल. तेव्हा आम्हाला तेज गोलंदाजांना जोखायचे आहे. त्यामुळेच शमीला संधी देण्यात आली आहे', असे प्रसाद स्पष्ट करतात. असेही म्हटले जाते की आशिया कपमध्ये न खेळता विश्रांतीचा पर्याय निवडणारा विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या संपूर्ण वनडे मालिकेत खेळणार आहे. तर पहिल्या दोन वनडेंमध्ये विश्रांती देण्यात आलेले भुवनेश्वरकुमार आणि जसप्रीत बुमराह हे दोघे विंडीजविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित तीन वनडेंमध्ये भाग घेतील. जायबंदी केदार जाधवही विंडीजविरुद्धच्या अखेरच्या तीन वनडेत खेळेल, अशी शक्यता आहे.
-धोनी हजारे ट्रॉफीत
निवड समिती अध्यक्ष प्रसाद यांनी सांगितले की, 'महेंद्रसिंग धोनी विजय हजारे ट्रॉफी वनडे स्पर्धेच्या बादफेरीत झारखंडचे प्रतिनिधित्व करणार असून अंबाती रायडूबाबत मात्र सध्या तरी माझ्याकडे काही माहिती नाही. हार्दिक पंड्या अजूनही सावरलेला नसून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तरी तो विश्रांतीच घेणार आहे'.
-तीन कर्णधार नाहीच
आशिया कपमध्ये रोहित शर्माने भारतीय संघाचे यशस्वी कर्णधारपद भूषवले. त्यानंतर कसोटी, वनडे आणि टी-२० अशा तीनही प्रकारांत भारतीय संघाचे वेगळे कर्णधार असतील, अशी चर्चा रंगू लागली. मात्र निवड समिती अध्यक्ष प्रसाद यांनी यात तथ्य नसल्याचे सांगत चर्चेला पूर्णविराम दिला. '२०१५मध्ये विराट कसोटी कर्णधार झाला, तर २०१७मध्ये त्याने वनडे संघाचे कर्णधारपदही भूषवायला सुरुवात केली. तो जबरदस्त कामगिरी करत असून कर्णधार म्हणून संघापुढे उत्तम उदाहरण आहे. खरेतर आमचा दृष्टिकोन असा आहे की, भारताच्या १५ही खेळाडूंनी कर्णधाराप्रमाणे विचार करावा. रोहित आणि अजिंक्य यांनी नेतृत्वाच्या संधीचे सोने केले आहेच. आता संघातील इतरही खेळाडू असा विचार करू लागले, तर महत्त्वाच्या क्षणी निर्णय घेण्याची वेळ आली तर प्रत्येक खेळाडू तयार असेल', असे प्रसाद नमूद करतात.
भारतीय संघः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद, शार्दूल ठाकूर.
वृत्तसंस्था, हैदराबाद
तरुणतडफदार यष्टीरक्षक, फलंदाज ऋषभ पंतची भारताच्या वनडे संघातही निवड करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन लढतींसाठी गुरुवारी भारतीय संघाची घोषणा झाली असून भविष्याची तजवीज म्हणून पंतचा समावेश करण्यात आला आहे. पुढील वर्षी रंगणाऱ्या वनडे वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिने भारतीय संघासाठी यष्टीरक्षकाची जडणघडण करण्यात येत असून पंतची निवड त्याचाच एक भाग समजली जाते आहे.
इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत ११४, तर विंडीजविरुद्धच्या राजकोट कसोटीत ९२ धावा करणारा पंत आता कुठे वीस वर्षांचा आहे. त्यामुळे सातत्याचा अभाव असलेल्या अनुभवी दिनेश कार्तिकऐवजी त्याला पसंती देण्यात आली आहे. सध्या तरी धोनी भारतीय संघात आहे, तेव्हा पंत हा तज्ज्ञ फलंदाज म्हणून संघात खेळणार का? या प्रश्नावर निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणतात, 'हो, अर्थातच; पण गरज भासल्यास तो यष्टीरक्षण करेलही. यात काहीच शंका नाही, की धोनी हा आपला पहिल्या क्रमांकाचा यष्टीरक्षक आहे. मात्र भविष्याचा विचार करता, अतिरिक्त यष्टीरक्षकाची सोय करून ठेवण्यात येते आहे. त्याच दृष्टिकोनातून आम्ही आधी दिनेश कार्तिकला संधी दिली आणि आता ऋषभ पंतला संधी दिली जाते आहे. या दोघांची कामगिरी बघून आम्ही पुढे एकाची निवड करू', असे प्रसाद म्हणाले.
-शमीचे पुनरागमन
तेज गोलंदाज मोहम्मद शमी अखेरची वनडे खेळला होता ती गेल्यावर्षी सप्टेंबरात. विंडीजविरुद्धच्या वनडेत त्याचे पुनरागमन झाले आहे. तिसरा तेज गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते आहे. 'वर्ल्डकपआधी भारताला फक्त १८ वनडे मिळणार आहेत. १९वी वनडे ही भारताची पहिली वर्ल्डकप लढत असेल. तेव्हा आम्हाला तेज गोलंदाजांना जोखायचे आहे. त्यामुळेच शमीला संधी देण्यात आली आहे', असे प्रसाद स्पष्ट करतात. असेही म्हटले जाते की आशिया कपमध्ये न खेळता विश्रांतीचा पर्याय निवडणारा विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या संपूर्ण वनडे मालिकेत खेळणार आहे. तर पहिल्या दोन वनडेंमध्ये विश्रांती देण्यात आलेले भुवनेश्वरकुमार आणि जसप्रीत बुमराह हे दोघे विंडीजविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित तीन वनडेंमध्ये भाग घेतील. जायबंदी केदार जाधवही विंडीजविरुद्धच्या अखेरच्या तीन वनडेत खेळेल, अशी शक्यता आहे.
-धोनी हजारे ट्रॉफीत
निवड समिती अध्यक्ष प्रसाद यांनी सांगितले की, 'महेंद्रसिंग धोनी विजय हजारे ट्रॉफी वनडे स्पर्धेच्या बादफेरीत झारखंडचे प्रतिनिधित्व करणार असून अंबाती रायडूबाबत मात्र सध्या तरी माझ्याकडे काही माहिती नाही. हार्दिक पंड्या अजूनही सावरलेला नसून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तरी तो विश्रांतीच घेणार आहे'.
-तीन कर्णधार नाहीच
आशिया कपमध्ये रोहित शर्माने भारतीय संघाचे यशस्वी कर्णधारपद भूषवले. त्यानंतर कसोटी, वनडे आणि टी-२० अशा तीनही प्रकारांत भारतीय संघाचे वेगळे कर्णधार असतील, अशी चर्चा रंगू लागली. मात्र निवड समिती अध्यक्ष प्रसाद यांनी यात तथ्य नसल्याचे सांगत चर्चेला पूर्णविराम दिला. '२०१५मध्ये विराट कसोटी कर्णधार झाला, तर २०१७मध्ये त्याने वनडे संघाचे कर्णधारपदही भूषवायला सुरुवात केली. तो जबरदस्त कामगिरी करत असून कर्णधार म्हणून संघापुढे उत्तम उदाहरण आहे. खरेतर आमचा दृष्टिकोन असा आहे की, भारताच्या १५ही खेळाडूंनी कर्णधाराप्रमाणे विचार करावा. रोहित आणि अजिंक्य यांनी नेतृत्वाच्या संधीचे सोने केले आहेच. आता संघातील इतरही खेळाडू असा विचार करू लागले, तर महत्त्वाच्या क्षणी निर्णय घेण्याची वेळ आली तर प्रत्येक खेळाडू तयार असेल', असे प्रसाद नमूद करतात.
भारतीय संघः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद, शार्दूल ठाकूर.