अ‍ॅपशहर

बेंगळुरूत इंग्लंडचा धुव्वा; चहलच्या सहा विकेट्स

भारताने बेंगळुरुमधील टी-२० सामन्यात इंग्लंडचा ७५ धावांनी धुव्वा उडवत मालिका जिंकली. यजुवेंद्र चहलच्या फिरकी गोलंदाजी समोर सपशेल शरणागती पत्कारली आणि इंग्लंडला १२७ धावांत गुंडाळले. इंग्लंडचे शेवटचे आठ फलंदाज अवघ्या आठ धावांत तंबूत परतले.

Maharashtra Times 1 Feb 2017, 10:51 pm
मटा ऑनलाइन वृत्त । बेंगळुरु
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india won t 20 series against england chahal get 6 wikets
बेंगळुरूत इंग्लंडचा धुव्वा; चहलच्या सहा विकेट्स


भारताने बेंगळुरुमधील टी-२० सामन्यात इंग्लंडचा ७५ धावांनी धुव्वा उडवत मालिका जिंकली. यजुवेंद्र चहलच्या फिरकी गोलंदाजी समोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारली आणि इंग्लंडचे आव्हान १२७ धावांत आटोपले. इंग्लंडचे आठ फलंदाज अवघ्या आठ धावांत तंबूत परतले.

भारताने दिलेले २०३ धावांचे आव्हान घेऊन इंग्लंडचे फलंदाज मैदानात उतरले. सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी टिचून मारा करत इंग्लंडच्या धावगतीला लगाम घातला. तिसऱ्या विकेटसाठी मॉर्गन आणि रूट जोडीने ६४ धावांची भागिदारी केली. त्यानंतर चहलने एकाच षटकात मॉर्गन आणि रूटला बाद करत इंग्लंड संघाच्या डावाला सुरुंग लावण्यास सुरुवात केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज