अ‍ॅपशहर

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सलामी विंडीजशी

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सलामी विंडीजशी२०१८-२०२३ मधील क्रिकेट कार्यक्रम निश्चितवृत्तसंस्था, दुबईपहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद ...

Maharashtra Times 21 Jun 2018, 4:00 am
वृत्तसंस्था, दुबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wtc


पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताचा संघ वेस्ट इंडिजला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०१८ते २०२३ या कालावधीसाठी जाहीर केलेल्या क्रिकेट कार्यक्रमात या स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे.

या स्पर्धेचा भाग म्हणून भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये दोन कसोटी सामने खेळेल, असे आयसीसीने म्हटले आहे.

या पहिल्यावहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल क्रमांकाचे नऊ संघ सहभागी होत असून १५ जुलै २०१९ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत ही स्पर्धा चालेल. वेस्ट इंडिजमधील ही दोन सामन्यांची मालिका २०१९च्या वर्ल्डकपनंतर होणार आहे. त्यात कसोटीसह तीन वनडे सामने व तेवढेच टी-२० सामनेही होतील. वेस्ट इंडिजचा संघही भारतात येणार असून त्यात तीन कसोटी, पाच वनडे व तीन टी-२० सामने होतील.

या कसोटी स्पर्धेत भारताचा दुसरा प्रतिस्पर्धी असेल दक्षिण आफ्रिका. त्यांच्याविरुद्ध भारतात तीन कसोटी सामने होणार आहेत. २०१९ ऑक्टोबरमधील या मालिकेनंतर भारत बांगलादेशशी खेळेल. बांगलादेशचा संघ दोन कसोटी व तीन टी-२० सामन्यांसाठी भारतात येणार आहे.

भारताच्या त्यानंतरच्या काही मालिकांत न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्ध २ कसोटी तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामने त्याअंतर्गत होतील. त्याआधी, भारताची इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकाही होईल.

या अजिंक्यपद स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार नाही, पण अंतिम फेरीत ते एकमेकांसमोर येऊ शकतात. या स्पर्धेत भारत १८ कसोटी खेळणार असून त्यात १२ कसोटी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व इंग्लंडशी होतील.

वनडे लीग

कसोटी स्पर्धेबरोबरच १२ कसोटी खेळणारे देश आणि नेदरलँडस अशी १३ संघांची वनडे लीगही आयोजित केली जाणार आहे. ती १ मे २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत होईल. दोन वर्षांच्या कालावधीत प्रत्येक संघ आठ मालिका खेळेल. भारत त्यातील पहिली मालिका श्रीलंकेत जाऊन खेळणार आहे. ती जून २०२०मध्ये खेळली जाईल. ही लीग २०२३च्या वर्ल्डकपसाठी पात्रता फेरी म्हणूनही ओळखली जाईल. ३१ मार्च २०२२रोजी वर्ल्डकपचे यजमान भारतासह लीगमधील सात अव्वल देश २०२३ वर्ल्डकपसाठी थेट पात्र असतील तर तळाच्या पाच संघांना आयसीसीच्या वर्ल्डकप पात्रता फेरीतून पात्र होण्याची आणखी एक संधी मिळेल.

२०१८ ते २०२३ या कालावधीत भारत २०० सामने खेळणार असून ते अन्य कोणत्याही संघापेक्षा अधिक आहेत. त्यातील १०२ सामने भारतात होणार असून त्यात पाकिस्तान आणि आयर्लंडचा समावेश नाही.

दृष्टिक्षेप

२०१८ ते २०२३चा क्रिकेट कार्यक्रम जाहीर

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची घोषणा

भारत खेळणार १८ कसोटी

पाकिस्तानशी कसोटी नाही

वनडे लीगचीही घोषणा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज