अ‍ॅपशहर

भारतीय संघाची आज निवड

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज (बुधवार) निवड होणार आहे. यात शिखर धवन आणि इशांत शर्मा यांना संधी मिळते की नाही, याबाबत उत्सुकता असणार आहे.

Maharashtra Times 26 Sep 2018, 4:00 am
नवी दिल्ली :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dhavan


वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज (बुधवार) निवड होणार आहे. यात शिखर धवन आणि इशांत शर्मा यांना संधी मिळते की नाही, याबाबत उत्सुकता असणार आहे. मालिकेतील पहिली कसोटी ४ ते ८ ऑक्टोबरला राजकोट येथे, तर १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान दुसरी कसोटी हैदराबाद येथे खेळली जाणार आहे. पाच सदस्यीय निवड समिती संघ बुधवारीच निश्चित करणार असले, तरी त्याची घोषणा शुक्रवारी आशिया कप स्पर्धेच्या अंतिम लढतीनंतर केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करताना वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज