अ‍ॅपशहर

भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकला नमवले

डावखुरी फिरकी गोलंदाज एकता बिस्ट हिच्या कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचा ७ विकेट आणि १६५ चेंडू राखून दणदणीत पराभव करत अंतीम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. इंग्लंडमध्ये याच वर्षी जून-जुलैमध्ये होणाऱ्या महिलांच्या वर्ल्डकपमध्ये यापूर्वीच आपली जागा पक्की केलेल्या भारतीय संघाने लीग आणि सुपर सिक्सच्या आपल्या सर्व लढती जिंकून क्रमांक एक संघाच्या रुपात अंतीम फेरीत धडक दिली आहे.

Maharashtra Times 19 Feb 2017, 8:30 pm
मटा ऑनलाइन वृत्त। कोलंबो
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indian women cricket team beats pakistan to make final in world cup qualifier
भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकला नमवले


डावखुरी फिरकी गोलंदाज एकता बिश्त हिच्या कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचा ७ विकेट आणि १६५ चेंडू राखून दणदणीत पराभव करत अंतीम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. इंग्लंडमध्ये याच वर्षी जून-जुलैमध्ये होणाऱ्या महिलांच्या वर्ल्डकपमध्ये यापूर्वीच आपली जागा पक्की केलेल्या भारतीय संघाने लीग आणि सुपर सिक्सच्या आपल्या सर्व लढती जिंकून क्रमांक एक संघाच्या रुपात अंतीम फेरीत धडक दिली आहे.

एकताने १० षटकांमध्ये केवळ ८ धावा देत पाच विकेट घेतल्या. ही तिच्या कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ कामगिरी ठरली आहे. याबरोबर ती एकदिवसीय सामन्यांत ५० किंवा त्याहून अधिक बळी घेणारी नववी भारतीय गोलंदाज ठरली आहे. एकताची चमकदार कामगिरी आणि शिखा पांडेने दिलेली साथ यामुळे भारताने पाकला ४३.४ षटकांमध्ये ६७ धावांतच गारद केले.

पाकिस्तानने उभारलेली भारताविरुद्धची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताने २२.३ षटकांमध्ये तीन विकेट गमावून ७० धावा बनवल्या आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. धडाकेबाज फलंदाजीचे दर्शन घडवणारी दीप्ती शर्मा २९ धावांवर नाबाद राहिली, तर हरमप्रीत कौरने २४ धावा केल्या. शेवटी वेदा कृष्णमूर्तीने विजय चौकार लगावला.

पाकिस्तानकडून सादिया यूसुफने दोन विकेट घेतल्या. यापूर्वी मिताली राजने नाणेफेक जिंकत पाकला फलंदाजीचे आमंत्रण दिले.

मध्यम गतीची गोलंदाज शिखा पांडे हिने पाकची पहिली फळी खिळखिळी करुन टाकण्यात यश मिळवले. त्यानंतर एकताने पाकचे काहीएक चालू दिले नाही. पाकिस्तानच्या केवळ दोन फलंदाज आयशा जफर (१९) आणि बिस्माह मारुफ (१३) याच काय त्या दोन अंकी धावसंख्या उभारू शकल्या. आवांतर धावांच्या जोरावरच पाकिस्तानचा धावफलक ५० च्यापुढे सरकू शकला. पाकने २४ आवांतर धावा घेतल्या. यात १३ वाइड होत्या. भारतासाठी एकता आणि शिखाव्यतिरिक्त हरमनप्रीत, दीप्ती शर्मा आणि देविका वैद्यने देखील प्रत्येकी एक बळी मिळवला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज