अ‍ॅपशहर

भारत-पाक सामन्याच्या मार्केटिंगवर सानिया मिर्झा नाराज

येत्या रविवारच्या भारत-पाकिस्तान वर्ल्डकप लढतीवर साऱ्यांचेच लक्ष लागले आहे; पण त्याचे 'मार्केटिंग' करण्यासाठी दोन्ही देशांतील टीव्ही वाहिन्यांनी केलेल्या जाहिरातींवर सानिया मिर्झा चांगलीच संतापली आहे. तिने अशा जाहिरातींवर टीका केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jun 2019, 10:12 am
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sania


येत्या रविवारच्या भारत-पाकिस्तान वर्ल्डकप लढतीवर साऱ्यांचेच लक्ष लागले आहे; पण त्याचे 'मार्केटिंग' करण्यासाठी दोन्ही देशांतील टीव्ही वाहिन्यांनी केलेल्या जाहिरातींवर सानिया मिर्झा चांगलीच संतापली आहे. तिने अशा जाहिरातींवर टीका केली आहे.

पाकिस्तानच्या टीव्हीने भारत-पाक लढतीच्या जाहिरातीत भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यावरून विनोद करण्याचा प्रयत्न केला आहे, तर भारतीय वाहिनीने जाहिरात करताना टीम इंडिया पाकिस्तान संघाचे 'अब्बू' म्हणून संबोधले आहे. सानियाने आपली नाराजी ट्विटरवर व्यक्त केली आहे. 'क्रिकेट सामन्यावरून दोन्ही बाजूंकडून जे बाळबोध प्रकार सुरू आहेत त्याची खरंतर अजिबात गरज नाही. भारत-पाकिस्तान सामन्याकडं सर्वांचं लक्ष आधीपासूनच लागलंय. त्यासाठी आणखी मार्केटिंगची गरज नाही. हे केवळ क्रिकेट आहे. त्यापलीकडं काही नाही. आणि कुणाला हे सगळं क्रिकेटच्या पलीकडचं काही वाटत असेल तर मग बसा तोच विषय धरून,' अशी उद्विग्नताही तिनं व्यक्त केलीय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज