मोहिंदर अमरनाथ
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा झाला असे म्हणता येणार नाही. कारण तीन कसोटींमध्ये खेळपट्ट्या या फक्त भारताला पोषक होत्या असे म्हणता येणार नाही. तरीदेखील भारताने नेटाने किल्ला लढवत विजय मिळवला. त्यामुळे कोहली आणि टीम खऱ्या अर्थाने जेत्यासारखी खेळली असे मी म्हणेन. अर्थात या मालिकेतही फलंदाजांची कामगिरी महत्वपूर्ण ठरली.
विराट कोहलीची कामगिरी पुन्हा एकदा वेगळी अन् दखल घेण्याजोगी होती. या माणसाचा खेळ जेवढा पाहावा तेवढा कमी वाटतो. कारण त्याची खेळी पाहताना खूप मजा येते. मला कोहलीमध्ये रिकी पाँटिंग आणि व्हिव रिचर्डस यांचा मेळ दिसतो. तो जेव्हा खेळपट्टीवर असतो तेव्हा उत्सुकता वाटते. आता नक्कीच काहीतरी सकारात्मक घडणार आहे, याची खात्री असते. कर्णधाराने अशी कामगिरी करणे ही संघासाठी जमेची बाजू ठरते; कारण संघनायक यशस्वी ठरत असेल, तर सहकारीदेखील सर्वोत्तम योगदान देण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. विराट कोहली हा संघाला प्रेरणा देणारा कर्णधार आहे.
मुरली विजयनेही मिळालेली संधी सत्कारणी लावली. तो अनुभवी आहेच; पण त्याला खेळाच्या तंत्राची खूप जाण आहे. विजय असेल तर आपल्याला सलामीला ‘डावे-उजवे’ असे कॉम्बिनेशन खूप चांगल्याप्रकारे वापरता. तो आणि शिखर ही जोडी भारतासाठी फायदेशीर ठरते. शिखर गोलंदाजांची चम्पी करतो, तर मुरली विजय संयमी खेळ करतो. विजय खूपच शांत आणि प्रगल्भ आहे. त्यानंतर नंबर लागतो तो पुजाराचा. पुजाराची शैली, प्रवृत्ती बघितली की मला राहुल द्रविडची आठवण येते. तर त्यानंतर विराट कोहली फलंदाजीला येतो. हा खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या नाकाखालून सामना घेऊन जातो. फक्त अजिंक्य रहाणेकडून कामगिरी झाली नाही. मात्र सर्वोत्तम फलंदाजदेखील अशा स्थितीत सापडतो. अशा स्थितीत कोणतीच गोष्ट मनाजोगी घडत नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून आपल्या गोलंदाजांची खूप छान तयारी झाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कठीण दौऱ्याआधी अशी मालिका भारतीय गोलंदाजांना सहाय्यक ठरली असे मला वाटते. खासकरून आपल्या तेज गोलंदाजांनी बरीच षटके टाकली. माझ्या मते भारताचा गृहपाठ परीपूर्ण झाला आहे. होय, श्रीलंकेचा हा संघ काही बलवान संघ नाही; पण भारतीय संघ एकजूट होऊन खेळला हे विशेष.
आता रविवारपासून श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेला सुरुवात होते आहे. धर्मशाला येथे ही झुंज रंगणार आहे. अर्थात भारत या मालिकेतही फेव्हरिटच असेल. श्रीलंका एखाददुसऱ्या सामन्यात चांगला खेळ करेल; पण भारतीय संघाच्या फलंदाजांचा घामटा काढणारे गोलंदाज किंवा तशी गुणवत्ता लाभलेले गोलंदाज सध्यातरी श्रीलंका संघात नाही. त्यात श्रीलंका संघाची मानसिकताच नकारात्मक वाटते. भारत आपल्यापेक्षा सरस आहे या मानसिकतेनेच ते वनडे मालिकेलाही समारे जातील.
कॉलमच्या अखेरीस पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेचा उल्लेख करेन. मला नाही वाटत की त्याला वनडे मालिकेत संधी मिळेल. कसोटीतच त्याला धावांसाठी कमालीचा संघर्ष करावा लागत होता. अशा वेळी आपण अजिंक्यला रणजी स्पर्धेत खेळण्यासाठी सोडायला हवे होते. तिथे खेळल्याने त्याला फायदा झाला असता. ज्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला पुढे दिसला असता. दक्षिण आफ्रिका दौऱ्याची पूर्वतयारी रणजी ट्रॉफीमध्ये खेळून खूप चांगली झाली असती.
(गेमप्लान)
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा झाला असे म्हणता येणार नाही. कारण तीन कसोटींमध्ये खेळपट्ट्या या फक्त भारताला पोषक होत्या असे म्हणता येणार नाही. तरीदेखील भारताने नेटाने किल्ला लढवत विजय मिळवला. त्यामुळे कोहली आणि टीम खऱ्या अर्थाने जेत्यासारखी खेळली असे मी म्हणेन. अर्थात या मालिकेतही फलंदाजांची कामगिरी महत्वपूर्ण ठरली.
विराट कोहलीची कामगिरी पुन्हा एकदा वेगळी अन् दखल घेण्याजोगी होती. या माणसाचा खेळ जेवढा पाहावा तेवढा कमी वाटतो. कारण त्याची खेळी पाहताना खूप मजा येते. मला कोहलीमध्ये रिकी पाँटिंग आणि व्हिव रिचर्डस यांचा मेळ दिसतो. तो जेव्हा खेळपट्टीवर असतो तेव्हा उत्सुकता वाटते. आता नक्कीच काहीतरी सकारात्मक घडणार आहे, याची खात्री असते. कर्णधाराने अशी कामगिरी करणे ही संघासाठी जमेची बाजू ठरते; कारण संघनायक यशस्वी ठरत असेल, तर सहकारीदेखील सर्वोत्तम योगदान देण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. विराट कोहली हा संघाला प्रेरणा देणारा कर्णधार आहे.
मुरली विजयनेही मिळालेली संधी सत्कारणी लावली. तो अनुभवी आहेच; पण त्याला खेळाच्या तंत्राची खूप जाण आहे. विजय असेल तर आपल्याला सलामीला ‘डावे-उजवे’ असे कॉम्बिनेशन खूप चांगल्याप्रकारे वापरता. तो आणि शिखर ही जोडी भारतासाठी फायदेशीर ठरते. शिखर गोलंदाजांची चम्पी करतो, तर मुरली विजय संयमी खेळ करतो. विजय खूपच शांत आणि प्रगल्भ आहे. त्यानंतर नंबर लागतो तो पुजाराचा. पुजाराची शैली, प्रवृत्ती बघितली की मला राहुल द्रविडची आठवण येते. तर त्यानंतर विराट कोहली फलंदाजीला येतो. हा खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या नाकाखालून सामना घेऊन जातो. फक्त अजिंक्य रहाणेकडून कामगिरी झाली नाही. मात्र सर्वोत्तम फलंदाजदेखील अशा स्थितीत सापडतो. अशा स्थितीत कोणतीच गोष्ट मनाजोगी घडत नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून आपल्या गोलंदाजांची खूप छान तयारी झाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कठीण दौऱ्याआधी अशी मालिका भारतीय गोलंदाजांना सहाय्यक ठरली असे मला वाटते. खासकरून आपल्या तेज गोलंदाजांनी बरीच षटके टाकली. माझ्या मते भारताचा गृहपाठ परीपूर्ण झाला आहे. होय, श्रीलंकेचा हा संघ काही बलवान संघ नाही; पण भारतीय संघ एकजूट होऊन खेळला हे विशेष.
आता रविवारपासून श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेला सुरुवात होते आहे. धर्मशाला येथे ही झुंज रंगणार आहे. अर्थात भारत या मालिकेतही फेव्हरिटच असेल. श्रीलंका एखाददुसऱ्या सामन्यात चांगला खेळ करेल; पण भारतीय संघाच्या फलंदाजांचा घामटा काढणारे गोलंदाज किंवा तशी गुणवत्ता लाभलेले गोलंदाज सध्यातरी श्रीलंका संघात नाही. त्यात श्रीलंका संघाची मानसिकताच नकारात्मक वाटते. भारत आपल्यापेक्षा सरस आहे या मानसिकतेनेच ते वनडे मालिकेलाही समारे जातील.
कॉलमच्या अखेरीस पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेचा उल्लेख करेन. मला नाही वाटत की त्याला वनडे मालिकेत संधी मिळेल. कसोटीतच त्याला धावांसाठी कमालीचा संघर्ष करावा लागत होता. अशा वेळी आपण अजिंक्यला रणजी स्पर्धेत खेळण्यासाठी सोडायला हवे होते. तिथे खेळल्याने त्याला फायदा झाला असता. ज्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला पुढे दिसला असता. दक्षिण आफ्रिका दौऱ्याची पूर्वतयारी रणजी ट्रॉफीमध्ये खेळून खूप चांगली झाली असती.
(गेमप्लान)