नवी दिल्ली : दुष्काळामुळे आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायन्टस यांचे बस्तान कुठे बसणार हे स्पष्ट होत नव्हते. आता हे दोन्ही संघ आयपीएलसाठी विखाशापट्टणममध्ये स्थायिक असतील. दरम्यान, आयपीएलच्या एलिमिनेटर व दुसरी क्वालिफायर दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियमवर होणार आहेत. या लढती आधी इडन गार्डन्सवर होणार होत्या. पंजाबच्या लढती धरमशालाला नव्हे तर मोहालीत होतील.
मुंबई, पुण्याचे बस्तान विशाखापट्टणमध्ये
दुष्काळामुळे आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायन्टस यांचे बस्तान कुठे बसणार हे स्पष्ट होत नव्हते. आता हे दोन्ही संघ आयपीएलसाठी विखाशापट्टणममध्ये स्थायिक असतील.
Maharashtra Times 30 Apr 2016, 10:31 pm