अ‍ॅपशहर

...तर मुंबई 'प्ले ऑफ'मध्ये!

गुजरात लायन्सकडून महत्त्वाच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या आयपीएलमधील 'प्ले-ऑफ'चे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. मात्र सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात आज होणाऱ्या लढतींचे निकाल मुंबईला अनुकूल लागले तर मुंबईला 'प्ले ऑफ'ची लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Maharashtra Times 22 May 2016, 12:55 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ipl 2016 play off qualification how others can be in play offs
...तर मुंबई 'प्ले ऑफ'मध्ये!


गुजरात लायन्सकडून महत्त्वाच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या आयपीएलमधील 'प्ले-ऑफ'चे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. मात्र सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात आज होणाऱ्या लढतींचे निकाल मुंबईला अनुकूल लागले तर मुंबईला 'प्ले ऑफ'ची लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईचा पराभव करुन गुजरातने हैदराबादसोबत 'प्ले ऑफ'मधील स्थान पक्के केले आहे. आता गुणतालिकेत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरू अशा चार संघांची गुणसंख्या १४ म्हणजेच समान झाली असून यातील कोणते दोन संघ 'प्ले ऑफ'मध्ये प्रवेश करणार याचं बरंचसं गणित सरासरीवर विसंबून आहे.

जर-तरचं गणित...

> हैदराबाद-कोलकाता सामन्यात कोलकाताचा पराभव मुंबईसाठी गरजेचा आहे. हैदराबादची प्रथम फलंदाजी आली तर ३० ते ४० धावांच्या फरकाने आणि कोलकाताने प्रथम फलंदाजी केली तर हैदराबादने ८ गडी आणि ४ ते ५ षटके राखून विजय मिळवणे आवश्यक आहे.

> ही लढत कोलकाताने जिंकल्यास कोलकाता १६ गुणांसह 'प्ले ऑफ'मध्ये प्रवेश करेल.

> दुसऱ्या लढतीत बेंगळुरूची प्रथम फलंदाजी आल्यास ४० ते ५० धावांनी आणि दिल्लीची प्रथम फलंदाजी आल्यास बेंगळुरूने ८ गडी आणि ४ षटके राखून विजय मिळवणे आवश्यक आहे. कोलकाताचा पराभव झाला आणि बेंगळुरूने मोठ्या फरकाने विजय मिळवला तर मुंबईच्या आशा जिवंत होतील.

> हैदराबाद आणि दिल्ली जिंकल्यास मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरूची गुणसंख्या १४ राहिल. मग त्यातील चांगली सरासरी असणारा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरेल.

> हैदराबाद आणि बेंगळुरू हे संघ जिंकले तर मुंबई, दिल्ली आणि कोलकाता यां संघांची गुणसंख्या समान होईल. यातून चांगली सरासरी असणारा संघ अंतिम चार संघात स्थान मिळवेल.


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज