बेंगळुरू:
शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्सच्या सामन्यात अखेर मुंबईनं सहा धावांनी बाजी मारली. मुंबईच्या १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूकडून कर्णधार विराट कोहली व एबी डी व्हिलियर्स यांनी चिवटपणे झुंज दिली. मात्र, ती व्यर्थ ठरली.
पाहा संपूर्ण स्कोअरकार्ड
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सनं २० षटकांत १८७ धावा केल्या होत्या. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा यानं सर्वाधिक ४८ धावा केल्या. त्याला सूर्यकुमार यादव (३८) व हार्दिक पंड्या (३२) यांनी चांगली साथ दिली. सलामीवीर क्विंटन डी कॉक व चौथ्या क्रमांकावर आलेल्या युवराज सिंगनं प्रत्येकी २३ धावा केल्या. झटपट धावांसाठी ओळखल्या जाणारा कायरन पोलार्ड व अन्य फलंदाज एकामोगामाग एक बाद होत असताना हार्दिक पंड्यानं मुंबईला भक्कम स्थितीत आणून ठेवले. त्यानं अवघ्या १४ चेंडूत ३२ धावा कुटल्या. त्याच्या या झंझावाती खेळीमुळं मुंबईला २० षटकांत १८७ धावांपर्यंत मजल मारता आली.
मुंबईचे १८८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बेंगळुरूची सलामीची जोडी फार काळ तग धरू शकली नाही. मोईन अली अवघे सात चेंडू खेळून तंबूत पतरला. त्यानं १३ धावा केल्या. पार्थिव पटेल २२ चेंडूत ३१ धावा काढून बाद झाला. सलामीची जोडी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि एबी डी व्हिलियर्स यांनी सूत्रे हाती घेतली. विराटनं ३२ चेंडूत ४६ धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतरही एबीडीनं एकहाती किल्ला लढवला. फटकेबाजी सुरूच ठेवत त्यानं ४१ चेंडूत नाबाद ७० धावा कुटल्या. मात्र, अन्य फलंदाजांची अपेक्षित साथ न मिळाल्यानं बेंगळुरूला लक्ष्य गाठता आलं नाही. बेंगळुरूचा डाव २० षटकांत पाच बाद १८१ धावांवर आटोपला. मुंबईकडून जसप्रीत बुमराह सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं चार षटकांत अवघ्या २० धावा देऊन तीन बळी घेतले. तर, बेंगळुरूकडून युजवेंद्र चहलनं चार बळी टिपले.
शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्सच्या सामन्यात अखेर मुंबईनं सहा धावांनी बाजी मारली. मुंबईच्या १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूकडून कर्णधार विराट कोहली व एबी डी व्हिलियर्स यांनी चिवटपणे झुंज दिली. मात्र, ती व्यर्थ ठरली.
पाहा संपूर्ण स्कोअरकार्ड
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सनं २० षटकांत १८७ धावा केल्या होत्या. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा यानं सर्वाधिक ४८ धावा केल्या. त्याला सूर्यकुमार यादव (३८) व हार्दिक पंड्या (३२) यांनी चांगली साथ दिली. सलामीवीर क्विंटन डी कॉक व चौथ्या क्रमांकावर आलेल्या युवराज सिंगनं प्रत्येकी २३ धावा केल्या. झटपट धावांसाठी ओळखल्या जाणारा कायरन पोलार्ड व अन्य फलंदाज एकामोगामाग एक बाद होत असताना हार्दिक पंड्यानं मुंबईला भक्कम स्थितीत आणून ठेवले. त्यानं अवघ्या १४ चेंडूत ३२ धावा कुटल्या. त्याच्या या झंझावाती खेळीमुळं मुंबईला २० षटकांत १८७ धावांपर्यंत मजल मारता आली.
मुंबईचे १८८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बेंगळुरूची सलामीची जोडी फार काळ तग धरू शकली नाही. मोईन अली अवघे सात चेंडू खेळून तंबूत पतरला. त्यानं १३ धावा केल्या. पार्थिव पटेल २२ चेंडूत ३१ धावा काढून बाद झाला. सलामीची जोडी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि एबी डी व्हिलियर्स यांनी सूत्रे हाती घेतली. विराटनं ३२ चेंडूत ४६ धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतरही एबीडीनं एकहाती किल्ला लढवला. फटकेबाजी सुरूच ठेवत त्यानं ४१ चेंडूत नाबाद ७० धावा कुटल्या. मात्र, अन्य फलंदाजांची अपेक्षित साथ न मिळाल्यानं बेंगळुरूला लक्ष्य गाठता आलं नाही. बेंगळुरूचा डाव २० षटकांत पाच बाद १८१ धावांवर आटोपला. मुंबईकडून जसप्रीत बुमराह सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं चार षटकांत अवघ्या २० धावा देऊन तीन बळी घेतले. तर, बेंगळुरूकडून युजवेंद्र चहलनं चार बळी टिपले.