वृत्तसंस्था, नवी दिल्ली:
स्थानिक क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची अधिकाधिक संधी उपलब्ध होण्यासाठी व त्यातून आयपीएलसाठी खेळाडूंची निवड करणे अधिक सोपे जावे म्हणून गेल्या वर्षीचा टी-२० मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेचा ढाचा यंदा बदलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. त्यानुसार यंदा आंतरविभाग स्पर्धा असा आराखडा न ठेवता पाचही विभागातील संघांमध्ये लढती ठेवून त्यातील दोन अव्वल संघ निवडण्यात येणार आहेत. म्हणजेच एकूण १० संघ निवडले जातील. त्यांची दोन गटात विभागणी करून (प्रत्येकी पाच) त्यांच्यात नंतर बाद पद्धतीने लढती होतील. २१ ते २७ जानेवारी या कालावधीत ही फेरी होईल. २७ व २८ जानेवारीला बेंगळुरू येथे आयपीएलचा लिलाव होणार असल्याने त्यावेळी मुश्ताक अली स्पर्धेत चमकलेल्या खेळाडूंचा अधिक सविस्तर विचार होऊ शकेल. २७ तारखेलाच मुश्ताक अली स्पर्धेची अंतिम फेरी असली तरी तोपर्यंत खेळाडूंची कामगिरी स्पष्ट झालेली असेल.
गेल्या वर्षी आंतरविभागीय ढाचानुसार स्पर्धा होत होती. त्यानुसार पाचही विभाग एकमेकांशी क्रमवार लढत आणि त्यातील सर्वाधिक गुण मिळविणारा विभाग विजेता ठरत असे. त्यामुळे मर्यादित खेळाडूंचाच खेळ पाहायला मिळत असे. आता मात्र हा ढाचा अधिक विस्तारल्याने आणखी खेळाडू पाहायला मिळू शकतील.
आयपीएलच्या फ्रँचाइझींनी आपापले प्रतिनिधी या सामन्यांसाठी विविध ठिकाणी पाठवले आहेत, ते या स्पर्धेतील चमकणाऱ्या खेळाडूंची नोंद घेतील.
स्थानिक क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची अधिकाधिक संधी उपलब्ध होण्यासाठी व त्यातून आयपीएलसाठी खेळाडूंची निवड करणे अधिक सोपे जावे म्हणून गेल्या वर्षीचा टी-२० मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेचा ढाचा यंदा बदलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. त्यानुसार यंदा आंतरविभाग स्पर्धा असा आराखडा न ठेवता पाचही विभागातील संघांमध्ये लढती ठेवून त्यातील दोन अव्वल संघ निवडण्यात येणार आहेत. म्हणजेच एकूण १० संघ निवडले जातील. त्यांची दोन गटात विभागणी करून (प्रत्येकी पाच) त्यांच्यात नंतर बाद पद्धतीने लढती होतील. २१ ते २७ जानेवारी या कालावधीत ही फेरी होईल. २७ व २८ जानेवारीला बेंगळुरू येथे आयपीएलचा लिलाव होणार असल्याने त्यावेळी मुश्ताक अली स्पर्धेत चमकलेल्या खेळाडूंचा अधिक सविस्तर विचार होऊ शकेल. २७ तारखेलाच मुश्ताक अली स्पर्धेची अंतिम फेरी असली तरी तोपर्यंत खेळाडूंची कामगिरी स्पष्ट झालेली असेल.
गेल्या वर्षी आंतरविभागीय ढाचानुसार स्पर्धा होत होती. त्यानुसार पाचही विभाग एकमेकांशी क्रमवार लढत आणि त्यातील सर्वाधिक गुण मिळविणारा विभाग विजेता ठरत असे. त्यामुळे मर्यादित खेळाडूंचाच खेळ पाहायला मिळत असे. आता मात्र हा ढाचा अधिक विस्तारल्याने आणखी खेळाडू पाहायला मिळू शकतील.
आयपीएलच्या फ्रँचाइझींनी आपापले प्रतिनिधी या सामन्यांसाठी विविध ठिकाणी पाठवले आहेत, ते या स्पर्धेतील चमकणाऱ्या खेळाडूंची नोंद घेतील.