अ‍ॅपशहर

Hardik Pandya : ७ महिने खूपच कठीण गेले: हार्दिक पंड्या

महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर टीकेचा धनी ठरलेला मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्यानं आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर भावनांना वाट मोकळी करून दिली. गेल्या सात महिन्यांचा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण होता. पुढे काय करायचं हे सूचत नव्हतं, असं हार्दिक म्हणाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Apr 2019, 3:16 pm
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hardik-pandya


महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर टीकेचा धनी ठरलेला मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्यानं आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर भावनांना वाट मोकळी करून दिली. गेल्या सात महिन्यांचा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण होता. पुढे काय करायचं हे सूचत नव्हतं, असं हार्दिक म्हणाला.

एका टीव्ही शोमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करून हार्दिक पंड्यानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला होता. त्याला चौफेर टीकेला सामोरे जावे लागले होते. बीसीसीआयनं तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरून त्याला घरी पाठवलं होतं. त्यानंतर त्याचं निलंबन रद्द करण्यात आलं होतं. सध्या तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. चेन्नईविरुद्ध संघाला विजय मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फटकेबाजी केली. तसंच ३ फलंदाजही बाद केले. मुंबई इंडियन्सच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा हार्दिक भावुक झाला होता. 'सात महिन्यांचा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण होता. पुढे काय करायचं हेच समजत नव्हतं,' असं तो म्हणाला. आता तो वाद मी पूर्णपणे विसरून गेलो आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयात महत्वाची भूमिका बजावल्यानं आनंदी आहे. सात महिने कठीण परिस्थितीत खेळलो. मी फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रीत करत होतो. प्रत्येक सामन्यात कामगिरीत सुधारणा करायची होती आणि आता चांगली फलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिल्यानं खूपच आनंदी आहे, अशा भावना त्यानं व्यक्त केल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज