अ‍ॅपशहर

मानहानीकारक पराभवानंतर राजस्थानच्या संघात उभी फूट? कुमार संगकाराचे अश्विनवर गंभीर आरोप

राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या अंतिम फेरीत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर आता राजस्थानच्या संघातील वातावरण बिघडायला सुरुवात झाली आहे. कारण आता राजस्थानच्या संघात खेळाडूंना दोष देण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. राजस्थानच्या कुमार संगकाराने आता आर. अश्विनवर जळजळीत टीका केली आहे. त्यामुळे आता राजस्थानच्या संघातील बऱ्याच गोष्टी समोर येऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 30 May 2022, 5:50 pm
अहमदाबाद : राजस्थानच्या संघाला आयपीएलच्या फायनलमध्ये लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. पराभव झाल्यावर आता राजस्थानच्या संघात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता राजस्थानच्या संघात मोठी फूट पडू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. राजस्थानच्या संघाचे संचालक आणि श्रीलंकेचे माजी कर्णधार कुमार संगकारा यांनी आता आर. अश्विनवर जळजळीत आरोप केले आहेत. त्यामुळे आता राजस्थानच्या संघातील निराशा या मार्गाने बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम राजस्थान रॉयल्स


संगकारा यांनी अश्विनवर कोणते आरोप केले आहेत, पाहा...
सामना संपल्यावर संगकारा यांनी अश्विनबाबत म्हटले आहे की, " अश्विन हा एक अनुभवी खेळाडू आहे आणि आतापर्यंत त्याने बरेच विक्रम रचले आहेत. पण एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर अश्विनच्या कामगिरीत अजूनही सुधारणेची गरज आहे. अश्विन हा एक ऑफ स्पिनर आहे. त्यामुळे त्याने जास्त त्यापद्धतीचे चेंडू टाकायला हवे. पण अश्विनकडून मात्र तशी गोष्ट आयपीएलमध्ये पाहायला मिळाली नाही. अश्विनने या आयपीएलमध्ये जास्त ऑफ स्पिन गोलंदाजी केलीच नाही, त्याने जास्तीत जास्त कॅरम बॉल टाकण्यावर भर दिला आणि त्याचाच फटका बसला. अश्विनने जर जास्त ऑफ स्पिन गोलंदाजी केली असती तर कदाचित परीणाम वेगळे असू शकले असते. त्यामुळे त्याला अजूनही सुधारणा करण्याची गरज आहे."
अश्विन हा राजस्थानच्या संघातील अनुभवी गोलंदाज होता. त्यामुळे त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण अश्विनला मात्र अंतिम फेरीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळेच आता त्याच्यावर पराभवाचे खापरही फोडले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण अश्विनने अंतिम फेरीत तीन षटके टाकली, या तीन षटकांमध्ये त्याने ३२ धावा दिल्या आणि एकही बळी त्याला मिळवता आला नाही. पण दुसरीकडे राजस्थानचा दुसरा फिरकीपटू युजवेंद्र चहलने दमदार गोलंदाजी केली. त्याचबरोबर चहलने या आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी मिळवले आणि पर्पल कॅपही पटकावली. त्यामुळे चहल हा अश्विनपेक्षा सरस ठरल्याचे पाहायला मिळाले आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख