अ‍ॅपशहर

अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने संधी दिली की पत्ता कट, आज जाहीर केला १६ खेळाडूंचा संघ...

Arjun Tendulkar : मुंबईने आज आपल्या संघातील १६ खेळाडूंची नावं जाहीर केली. यामध्ये रोहित शर्मापासून इशान किशनपर्यंत खेळाडूंचा समावेश आहे. पण या सर्व खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचे नाव आहे की नाही, याची उत्सुकता सर्वांना आहे. मुंबईने आज १६ खेळाडूंची नावं जाहीर केली, त्यामध्ये अर्जुनचे नाव आहे की नाही, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 15 Nov 2022, 9:47 pm
नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सने आज आपला १६ खेळाडूंचा संघ जाहीर केला. यावेळी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन सारख्या खेळाडूंना मुंबईने आपल्या संघात कायम ठेवले आहे. पण यावेळी सर्वांनाच उत्सुकता आहे की, अर्जुन तेंडुलकर हा पुढच्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या संघात राहणार की नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Arjun Tendulkar
सौजन्य-ट्विटर


अर्जुन हा गेल्या तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या संघात आहे. मुंबईच्या संघाने अर्जुनला दोनवेळा लिलावातून आपल्या ताफ्यात दाखल केले आहे. पण काही दिवसांपूर्वी अर्जुनने मुंबईच्या संघाला सोडचिठ्ठी दिली होती आणि त्याने गोव्याच्या संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अर्जुनला मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान मिळणार नाही, असे म्हटले जात होते. पण आता मुंबईच्या संघाने आपल्या ताफ्यात कायम ठेवणाऱ्या १६ खेळाडूंची यादीच यावेळी जाहीर केली आहे.

मुंबई इंडियन्सने संघात कायम ठेवलेले खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार), टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मढवाल (Rohit Sharma (captain), Tim David, Ramandeep Singh, Tilak Varma, Suryakumar Yadav, Ishan Kishan, Tristan Stubbs, Dewald Brevis, Jofra Archer, Jasprit Bumrah, Arjun Tendulkar, Arshad Khan, Kumar Kartikeya, Hrithik Shokeen, Jason Behrendorff, Akash Madhwal).

मुंबई इंडियन्सने यावेळी अर्जुनला आपल्या संघात कायम ठेवले आहे. अर्जुनला यावेळी किती रक्कम मिळेल, हे समजू शकणार नाही. पण तो मुंबईच्या संघात कायम असेल. आतापर्यंत अर्जुनला मुंबईच्या संघाने संघात कायम ठेवले होते, पण अजूनही त्याला पदार्पणाची संधी मात्र त्यांनी दिलेली नाही. त्यामुळे आता पुढच्या हंगामात तरी त्याला पदार्पणाची संधी मिळणार की नाही, याची उत्सुकता आता चाहत्यांना असेल. त्यामुळे आता पुढच्या हंगामात अर्जुनला संधी मिळते का आणि तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख