कोलकाता : आरसीबीच्या संघाला प्ले ऑफची चांगली लॉटरी लागली. कारण मुंबई इंडियन्सने विजय साकारला आणि त्यामुळेच त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचता आले. पण आता आरसीबीच्या संघाला मोठा धक्का बसू शकतो. कारण सामना न खेळता त्यांच्यावर आयपीएलबाहेर पडण्याची नामुष्की येऊ शकते, असे समोर येत आहे.
आरसीबीच्या संघाबरोबर असं नेमकं काय होऊ शकतं, जाणून घ्या...आरसीबीचा संघ आता आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये पोहोचला आहे. या सामन्यात आरसीबीच्या संघाला लखनौ सुपर जायंट्स संघाबरोबर दोन हात करावे लागणार आहेत. पण सध्याच्या घडीला कोलकातामध्ये पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळे हा सामना होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे जर आरसीबी आणि लखनौ यांच्यमध्ये २० षटकांचा जर सामना होऊ शकला नाही तर किमान पाच षटकांचा सामना व्हावा, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील असेल. त्यामुळे दोन्ही संघांत किमान पाच षटकांचा तरी सामना खेळवण्यावर भर दिला जाईल. पण जर पावसामुळे पाच षटकांचा सामनाही होऊ शकला नाही तर सुपर ओव्हर खेळवण्यावर भर दिला जाईल. त्यानुसार या एका सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांचे भवितव्य ठरवण्यात येणार आहे. या सुपर ओव्हरमध्ये जो संघ विजयी ठरले, तो पुढच्या क्वालिफायर-२ या सामन्यात पोहोचेल. पण जर या सुपर ओव्हरमध्येही निकाल लागू शकला नाही तर गुणतालिकेत जो संघ आघाडीवर आहे, त्यानुसार निकाल लावला जाईल. जर गुणतालिकेवर नजर फिरवली तर लखनौचा संघ हा तिसऱ्या आणि आरसीबीचा चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे गुणतालिकेनुसार निकाल लावण्यात आला तर लखनौचा संघ आयपीमध्ये पुढे जाईल तर आरसीबीचा संघ हा आयपीएलधून बाहेर पडेल. त्यामुळे गुणतालिकेत चौथ्या स्थानावर राहिल्याचा फटका यावेळी आरसीबीच्या संघाला बसू शकतो. त्यामुळे जर पावसामुळे एकही षटक होऊ शकले नाही तर आरसीबीच्या संघाला आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात किमान सुपर ओव्हर तरी व्हावी, अशी प्रार्थना आरसीबीचा संघ करत असेल.
आरसीबीच्या संघाबरोबर असं नेमकं काय होऊ शकतं, जाणून घ्या...आरसीबीचा संघ आता आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये पोहोचला आहे. या सामन्यात आरसीबीच्या संघाला लखनौ सुपर जायंट्स संघाबरोबर दोन हात करावे लागणार आहेत. पण सध्याच्या घडीला कोलकातामध्ये पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळे हा सामना होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे जर आरसीबी आणि लखनौ यांच्यमध्ये २० षटकांचा जर सामना होऊ शकला नाही तर किमान पाच षटकांचा सामना व्हावा, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील असेल. त्यामुळे दोन्ही संघांत किमान पाच षटकांचा तरी सामना खेळवण्यावर भर दिला जाईल. पण जर पावसामुळे पाच षटकांचा सामनाही होऊ शकला नाही तर सुपर ओव्हर खेळवण्यावर भर दिला जाईल. त्यानुसार या एका सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांचे भवितव्य ठरवण्यात येणार आहे. या सुपर ओव्हरमध्ये जो संघ विजयी ठरले, तो पुढच्या क्वालिफायर-२ या सामन्यात पोहोचेल. पण जर या सुपर ओव्हरमध्येही निकाल लागू शकला नाही तर गुणतालिकेत जो संघ आघाडीवर आहे, त्यानुसार निकाल लावला जाईल. जर गुणतालिकेवर नजर फिरवली तर लखनौचा संघ हा तिसऱ्या आणि आरसीबीचा चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे गुणतालिकेनुसार निकाल लावण्यात आला तर लखनौचा संघ आयपीमध्ये पुढे जाईल तर आरसीबीचा संघ हा आयपीएलधून बाहेर पडेल. त्यामुळे गुणतालिकेत चौथ्या स्थानावर राहिल्याचा फटका यावेळी आरसीबीच्या संघाला बसू शकतो. त्यामुळे जर पावसामुळे एकही षटक होऊ शकले नाही तर आरसीबीच्या संघाला आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात किमान सुपर ओव्हर तरी व्हावी, अशी प्रार्थना आरसीबीचा संघ करत असेल.