अ‍ॅपशहर

IPLमधला मोठा घोळ; दिल्लीच्या खेळाडूला दोन दिवस टॉवेलवरच फिरावे लागले, ऐका भन्नाट किस्सा...

कोणाबरोबर कधी काय होऊ शकते, हे कोणीही सांगू शकत नाही. आयपीएल खेळण्यासाठी तो भारतात मोठ्या उत्साहात दाखल झाला. पण भारतात आल्यावर त्याला मोठा धक्काच बसला. कारण भारतात आल्यावर एक मोठा घोळ झाला आणि दिल्लीच्या संघातील एका खेळाडूला २-३ दिवस फक्त टॉवेल गुंडाळूनच फिरावे लागले होते. नेमंक घडलं तरी काय, पाहा..

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 16 May 2022, 5:42 pm

हायलाइट्स:

  • दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूबाबत एक अजब गोष्ट घडली
  • दिल्लीच्या या खेळाडूला दोन दिवस टॉवेलवरच राहावे लागले.
  • नेमकं असं घडलं तरी काय होतं, जाणून घ्या...
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम रोवमन पॉवेल (सौजन्य-ट्विटर)
मुंबई : आयपीएलमधला सर्वात मोठा घोळ आता समोर आला आहे. आयपीएलमधले खेळाडू मैदानात उतरताना त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमी दिसत नाही. कपड्यांपासून ते छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत त्यांच्याकडे सर्व गोष्टी उपलब्ध असतात. पण आयपीएलमध्ये आता अशी एक गोष्ट समोर आली आहे की, दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूला दोन दिवस फक्त टॉवेलवर राहण्याची पाळी आली होती.
दिल्लीच्या या खेळाडूबाबत नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या...
दिल्लीच्या संघातील हुकमी एक्का ठरत आहे तो वेस्ट इंडिजचा रोवमन पॉवेल. पण पॉवेलबाबत एक मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे. पॉवेल हा भारतामध्ये आयपीएल खेळण्यासाठी जोशात दाखल झाला. पण जेव्हा तो भारतामध्ये उतरला तेव्हा त्याला मोठा धक्काच बसला. विमानातून उतरल्यावर तो आपल्या बॅग्स घेण्यासाठी विमानतळावर दाखल झाला. सर्व प्रवाशांच्या बॅग्स आल्या, पण पॉवेलला आपली बॅग काही दिसत नव्हती. मी एअरलाइन्सकडे या गोष्टीची तक्रार केली. पण एअरलाइन्सने त्याला सांगितले की, त्याची कोणतीही बॅग त्यांच्याकडे नाही. आता नेमकं काय करायचं, हा मोठा प्रश्न पॉवेलपुढे उभा राहीला होता. कारण त्याच्याकडे आता फक्त एकच हँडबॅग होती. या एका हँडबॅगनिशी तो हॉटेलमध्ये दाखल झाला. आता ही गोष्ट कोणाला सांगायची, हा प्रश्न त्याच्यापुढे पडला होता. हॉटेलमध्ये दाखल झाल्यावर तो दोन दिवस फक्त टॉवेलवरच राहावे लागले होते.
याबाबत पॉवेल म्हणाला की, " मी मुंबई दाखल झालो तेव्हा एअरलाइन्सने मला सांगितले की, माझी कोणतीही बॅग त्यांच्याकडे नाही. त्यावेळी माझ्याकडे फक्त एकच हँडबॅग होती. माझ्याकडे कोणतेही कपडे नव्हते. त्यामुळे मी हॉटेलमध्ये २-३ दिवस फक्त टॉवेलवरच राहीलो होतो. या २-३ दिवसांमध्ये जर कोणी माझ्या हॉटेलमधील रुनचा दरवाजा ठोठावला तर त्यांना मी रुममध्ये घेत नव्हतो. त्यावेळी मी रुमच्या दरवाज्यामागे उभे राहुनच सर्वांशी बोलत होतो. हे २-३ दिवस माझ्यासाठी खरंच खडतर गेले होते."
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज