दुबई: आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्धच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने ६ षटकात २४ धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर देखील त्यांची अवस्था फार चांगली नव्हती चेन्नईने १८ षटकात ५ बाद ११७ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर असे काही झाले की चेन्नईला विजयासाठीची किक मिळाली आणि मुंबईच्या हातातून सामना निसटला.
वाचा- मुंबई इंडियन्सचे कुठे चुकले, यामुळे झाला पराभव; गायकवाडने केला विक्रम
चेन्नईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण फाफ डुप्लेसिस, मोईन अली, सुरैश रैना आणि धोनी या महत्त्वाच्या विकेट फक्त २४ धावात गमावल्याने मुंबईने सामन्यावर पकड मिळवली होती. चेन्नईचा ऋतुराज गायकवाड एका बाजूने खेळत होता. पण धावसंख्या विजय मिळवण्यासाठी पुरेशी नव्हती. विजयासाठीची खरी किक चेन्नईला १९व्या षटकात मिळाली.
वाचा- IPL 2021चा दुसरा टप्पा: ५ मोठ्या विक्रमांवर दिग्गजांची नजर
मुंबईचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्टने शानदरा गोलंदाजी केली त्याने ३ षटकात फक्त ११ धावा देत दोन विकेट घेतल्या. रोहित शर्माच्या गैरहजेरीत कर्णधार कायरन पोलार्डने १९व्या षटकात बोल्टकडे चेंडू सोपवला. पण यावेळी मात्र चेन्नईने बाजी मारली. गायकवाड आणि ब्रावो यांनी बोल्टच्या या ओव्हरमध्ये २४ धावा लुटल्या.
पहिल्या चेंडूवर ऋतुराजने चौकार मारला, त्यानंतर एक धाव काढून ब्रावोला स्ट्राईक दिला. तिसऱ्या चेंडू त्याने चौकार मारला. मग चौथा चेंडू त्याने थेट बाहेर घालवला. पाचव्या चेंडूवर ब्रावोने एक धाव काढली. ब्रावो शो झाल्यानंतर ऋतुराजने संधी सोडली नाही. त्याने अखेरच्या चेंडूवर षटकार मारत संघाला १४० पर्यंत पोहोचवले.
वाचा- मुंबई इंडियन्सचे कुठे चुकले, यामुळे झाला पराभव; गायकवाडने केला विक्रम
चेन्नईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण फाफ डुप्लेसिस, मोईन अली, सुरैश रैना आणि धोनी या महत्त्वाच्या विकेट फक्त २४ धावात गमावल्याने मुंबईने सामन्यावर पकड मिळवली होती. चेन्नईचा ऋतुराज गायकवाड एका बाजूने खेळत होता. पण धावसंख्या विजय मिळवण्यासाठी पुरेशी नव्हती. विजयासाठीची खरी किक चेन्नईला १९व्या षटकात मिळाली.
वाचा- IPL 2021चा दुसरा टप्पा: ५ मोठ्या विक्रमांवर दिग्गजांची नजर
मुंबईचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्टने शानदरा गोलंदाजी केली त्याने ३ षटकात फक्त ११ धावा देत दोन विकेट घेतल्या. रोहित शर्माच्या गैरहजेरीत कर्णधार कायरन पोलार्डने १९व्या षटकात बोल्टकडे चेंडू सोपवला. पण यावेळी मात्र चेन्नईने बाजी मारली. गायकवाड आणि ब्रावो यांनी बोल्टच्या या ओव्हरमध्ये २४ धावा लुटल्या.
पहिल्या चेंडूवर ऋतुराजने चौकार मारला, त्यानंतर एक धाव काढून ब्रावोला स्ट्राईक दिला. तिसऱ्या चेंडू त्याने चौकार मारला. मग चौथा चेंडू त्याने थेट बाहेर घालवला. पाचव्या चेंडूवर ब्रावोने एक धाव काढली. ब्रावो शो झाल्यानंतर ऋतुराजने संधी सोडली नाही. त्याने अखेरच्या चेंडूवर षटकार मारत संघाला १४० पर्यंत पोहोचवले.