अ‍ॅपशहर

पावसामुळे IPL Final 2023 झाली नाही तर कसा ठरवणार विजेता; जाणून घ्या आयपीएलचे नियम

Rain In IPL Final 2023 : गुजरात आणि चेन्नईच्या सामन्यात पाऊस होणार असल्याचे आता समोर आले आहे. पण जर पावसामुळे हा सामना होऊ कला नाही विजेता कसा ठरवला जाणार आहे, हे आता समोर आले आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 28 May 2023, 5:36 pm
अहमदाबाद : शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स लढतीच्याआधी पावसाचा अडथळा आला होता. ज्यामुळे लढत जवळपास अर्धातास विलंबाने सुरू झाली. रविवारी रंगणाऱ्या आयपीएल अंतिम लढतीच्यावेळीही वीजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यात जर पाऊस पडला तर काय होऊ शकते, याते नियम आता समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IPL Final 2023
सौजन्य-आयपीएल


हवामानाच्या वेबसाइटनुसारही लढतीच्याआधी अगदी सातवाजेपर्यंत पावसाची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले असून त्यानंतर म्हणजेच संध्याकाळी साडेसातनंतर पावसाची शक्यता थोडी कमी आहे. पण सामन्याची जी नियोजित वेळ आहे त्यावेळी मात्र पाऊस पडणार असल्याची जोरदार शक्यता आहे. पण जोपर्यंत पाऊस थांबणार नाही तोपर्यंत सामना सुरु होऊ शकत नाही.

... तर राखीव दिवस
आयपीएलच्या नियमांनुसार आज, रविवार २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या अंतिम फेरीसाठी राखीव दिवसाचे प्रयोजन करण्यात आले आहे. या राखीव दिवशी अतिरिक्त १२० मिनिटांता अवधी उपलब्ध असेल. अन् जर का अंतिम लढत रविवारी सुरू झाली अन् सामन्यातील पहिल्या चेंडूनंतर काही कारणास्तव सामना झालाच नाही, तर सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी होईल. असा सामना जिथे आदल्यादिवशी थांबला होता, तिथूनच सुरू होईल. अन् राखीव दिवशीदेखील पावसाचा व्यत्यय आला. सुपर ओव्हर खेळविणेही शक्य झाले नाही, तर प्रतिस्पर्धी संघांच्या साखळीतील क्रमांकावरून विजेता घोषित होईल. या गोष्टीचा अर्थ असा होतो की जर राखीव दिवशीही हा सामना होऊ शकला नाही तर गुजरात टायटन्स हा संघ विजेता ठरू शकतो. पण पावसानंतर साधारण सामना हा संध्याकाळी ७.३० ला सुरु होतो. पण त्यापूर्वी हा पाऊस आणि सामन्याचा एक तास त्यामुळे वाया जाऊ शकतो. त्यामुळे या सामन्याचा टॉस हा ७.४५ च्या दरम्यान सुरु होऊ शकतो आणि सामना रात्री ८.०० वाजता सुरु होऊ शकतो, असे भाकीत वर्तवले जात आहे. हा सामना जर रात्री ९.४० च्या आधी सुरु झाला तर तो २० षटकांचा होणार, आयपीएलच्या नियमांमध्ये म्हटले गेले आहे. त्यामुळे आयपीएलचा अंतिम फेरीचा सामना हा २० षटकांचा होऊ शकतो.

या सामन्याच्या पूर्वी पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे आता या सामन्यात किती वेळ पाऊस पडतो, हे पाहणे महत्वाचे असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज