अ‍ॅपशहर

ठरलं.... आयपीएलची फायनल आता किती षटकांची होणार, जाणून घ्या पंचांनी काय सांगितलं....

IPL Final : आयपीएल फायनलच्या रीझर्व डे च्या दिवशीही पाऊस आलाच. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला.पाऊस थांबल्यावर पंचांनी मैदानाची पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी हा सामना किती षटकांचा होणार हे सांगितले.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 29 May 2023, 11:46 pm
अहमदाबाद : आयपीएलच्या फायनलच्या राखीव दिवशीही पावसाने व्यत्यय आणला. त्यानंतर आता पंचांनी मैदानाची पाहणी केली आहे आणि त्यांनी हा सामना आता किती षटकांचा होऊ शकतो, हे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IPL FINAL
सौजन्य-ट्विटर


या सामन्यात पहिला डाव सलीसलामत पार पाडला. गुजरातच्या साई सुदर्शनने यावेळी ९६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्याला वृद्धिमान साहाने अर्धशतकी साथ दिली. दमदार फलंदाजी करत गुजराच्या संघाने यावेळी २१४ धावांचा डोंगर उभारला. चेन्नईचा संघ २१५ धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरला खरा. पण चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने यावेळी चौकार मारला आणि त्यानंतर पावसाचे मैदानात आगमन झाले. त्यानंतर जवळपास अर्धा तास तरी पाऊस पडला. त्यानंतर पंचांनी रात्री १०.४५ वाजता मैदानाची पाहणी केली. त्यानंतर पंचांनी पुन्हा एकदा ११.३० वाजता पाहणी करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी हा सामना किती षटकांचा खेळवला जाऊ शकतो, हे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार आता मध्यरात्री १२.१० वाजता सामना सुरु होईल आणि तो १५ षटकांचा असेल. चेन्नईला यावेळी १५ षटकांत १७० धावांचे आव्हान देण्यात आले आहे.

धोनीने या सामन्याचा टॉस जिंकला होता आणि त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईने यावेळी टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्यचा निर्णय त्याने घेतला. मुंबईने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी केली होती आणि त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे धोनी याववेळी प्रथम फलंदाजी घेईल, असे त्याला वाटले होते. पण धोनीने गोलंदाजी घेतल्यामुळे हार्दिकही चकीत झाला. पण या सामन्यासाठी हा सर्वात मोठा निर्णय असल्याचे म्हटले जात आहे.

कारण रविवारी पाऊस पडला होता. त्यामुळे खेळपट्टी जरी ओली नसली तरी जमिनीचा ओलावा मात्र नक्कीच असणार. त्याचबरोबर आज गुजरातमध्ये ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे या सामन्यात जो प्रथम गोलंदाजी करणार त्यांना मदत मिळणार आहे. ही गोष्ट धोनीला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे धोनीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. पण धोनीचा हा निर्णय फसल्याचे पाहायला मिळाले. कारण पावसानंतरही गुजरातच्या फलंदाजांना जास्त फायदा झाला आणि त्यांनी दोनशेपेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारला.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज