अ‍ॅपशहर

पराभव होऊनही लखनौचा संघ प्ले ऑफमध्ये दाखल होऊ शकतो, फक्त ही एकच असेल अट...

आयपीएलमध्ये विजयासह संघ प्ले ऑफमध्ये जातात, हे तुम्ही आतापर्यंत ऐकलेले असेल. पण यावेळी मात्र लखनौचा संघ हा पराभवानंतरही प्ले ऑफमध्ये जाऊ शकतो, असे दिसत आहे. पण त्यासाठी मात्र फक्त एकच अट असणार आहे. ही अट पूर्ण झाली तर लखनौचा संघ पराभवानंतरही प्ले ऑफमध्ये जाऊ शकतो. यासाठी गुणतालिकेवर जनर फिरवली, तर सर्व गोष्टी स्पष्ट होऊ शकतात.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 18 May 2022, 5:40 pm
मुंबई : आयपीएलच्या प्ले ऑफचा ज्वर आता चांगलाच चढला आहे आणि प्रत्येक संघ आता विजयासाठी धडपडत आहे. पण दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा पराभव झाला तरी ते प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात, असे आता दिसत आहे. पण त्यासाठी फक्त एकच गोष्ट घडणे गरेजेचे आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम लखनौ (सौजन्य-ट्विटर)

पराभवानंतरही लखनौचा संघ कसा काय प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो, जाणून घ्या...गुणतालिकेत सध्याच्या घडीला पाहिले तर कोणता संघ प्ले ऑफमध्ये पोहोचेल, हे सांगता येणार नाही. यासाठी अपवाद फक्त गुजरातच्या संघाचा आहे. कारण त्यांचे २० गुण झालेले आहेत. पण बाकीच्या सात संघांमध्ये मात्र चांगलीच चुरस रंगली आहे. आज लखनौ आणि केकेआर यांचा आयपीएलमधील अखेरचा साखळी सामना आहे. या सामन्यात केकेआरच्या संघाने विजय मिळवला तर त्यांचे आव्हान कायम राहील. पण लखनौच्या संघाचा पराभव झाला तरी त्यांचे आव्हान संपुष्टात येणार नाही. कारण सध्याच्या घडीला गुणतालिकेत पाहिले तर केकेआर, पंजाब आणि हैदराबाद यांचे विजयासह १४ गुण होऊ शकतात. गुणतालिकेत सध्याच्या घडीला आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांचे १४ गुण आहेत. त्यामुळे त्यांनी जर अखेरचा सामना जिंकला तर त्यांचे १६ गुण होऊ शकतात. सध्याच्या घडीला गुणतालिकेत लखनौ आणि राजस्थान यांचे १६ असे समान गुण आहेत. त्यामुळे विजयासह या दोन्ही संघांना १८ गुण पटकावता येतील आणि ते थेट प्ले ऑफमध्ये आपली जागा कायम करतील. आज लखनौचा केकेआरबरोबर सामना आहे. पण आजच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला तरी त्यांचे १६ गुण राहतील. या १६ गुणांपर्यंत केकेआर, पंजाब आणि हैदराबाद हे संघ पोहैचू शकत नाहीत. आयपीएलमध्ये आता आरसीबी आणि दिल्ली यांचेच फक्त १६ गुण होऊ शकतात. पण यावेळी रन रेट हा सर्वात महत्वाचा मुद्दा ठरू शकतो. सध्याच्या घडीला लखनौच्या संघाचा 0.262 असा रनरेट आहे, तर आरसीबीचा रनरेट हा -0.323 एवढा आहे. त्यामुळे आरसीबीने विजय मिळवला तर त्यांचे १६ गुण होतील. पण त्यांना मोठा विजय मिळवता आला नाही तर १६ गुण झाल्यावरही ते प्ले ऑफमध्ये पोहोचू शकणार नाहीत आणि लखनौचा प्ले ऑफचा मार्ग पराभवानंतरही खुला असेल. त्यामुळे आरसीबीला प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना फक्त विजय नाही तर मोठा विजय मिळवावा लागेल. दुसरीकडे लखनौचा मोठा पराभव झाला तर त्यांचे आव्हान संपुष्टातही येऊ शकते.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज