नवी दिल्ली :
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच यंदाची आयपीएल स्पर्धा सुरू झाली असून किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून आयपीएलमध्ये सहभागी क्रिकेटपटूंच्या मतदानाबाबत विनंती केली आहे.
आयपीएल सामन्यांसाठी खेळाडूंना देशातील विविध शहरांत जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन मतदानादिवशी खेळाडू जिथे असेल त्या शहरात त्याला मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळावी, अशी विनंती अश्विनने ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
पंतप्रधानांनी मतदार जागृतीसाठी आवाहन करण्याचा आग्रह करताना अश्विनसह शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, दीपा कर्माकर, हीमा दास आणि साक्षी मलिक या क्रीडा जगतातील स्टार खेळाडूंना टॅग केले होते. त्याला प्रतिसाद देत अश्विनने आपली विनंती पुढे केली असली तरी मतदान प्रक्रिया निवडणूक आयोग राबवत असल्याने याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगच घेऊ शकणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच यंदाची आयपीएल स्पर्धा सुरू झाली असून किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून आयपीएलमध्ये सहभागी क्रिकेटपटूंच्या मतदानाबाबत विनंती केली आहे.
आयपीएल सामन्यांसाठी खेळाडूंना देशातील विविध शहरांत जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन मतदानादिवशी खेळाडू जिथे असेल त्या शहरात त्याला मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळावी, अशी विनंती अश्विनने ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
पंतप्रधानांनी मतदार जागृतीसाठी आवाहन करण्याचा आग्रह करताना अश्विनसह शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, दीपा कर्माकर, हीमा दास आणि साक्षी मलिक या क्रीडा जगतातील स्टार खेळाडूंना टॅग केले होते. त्याला प्रतिसाद देत अश्विनने आपली विनंती पुढे केली असली तरी मतदान प्रक्रिया निवडणूक आयोग राबवत असल्याने याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगच घेऊ शकणार आहे.