मुंबई: करोना व्हायरसमुळे देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे अखेर जी भीती वाटत होती तसेच घडले. बीसीसीआयने आयपीएलचा १३वा हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवल्याचे जाहीर केले. तेव्हापासून आयपीएल पुन्हा एकदा स्थगित करावे लागणार अशीच चर्चा सुरू होती. अखेर बीसीसीआयने काल रात्री उशिरा हा निर्णय घेतल्याचे समजते.
वाचा- क्रिकेटपटूने विचारले, बेबी मैं क्या हूं तेरा
बीसीसीआयमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता ही स्पर्धा एप्रिल-मे मध्ये होण्याची शक्यता नाही. अर्थात बीसीसीआयकडून अद्याप यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने आयपीएलमधील ८ संघांना आणि प्रायोजकांना याची कल्पना दिली आहे.
वाचा- भारत-पाकिस्तान मालिका होणार नाही - गावस्कर
आयपीएलचा १३वा हंगाम स्थगित केला जात आहे रद्द नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आम्हाला आशा आहे की या वर्षाच्या अखेरीस आयपीएल होऊ शकेल. यासाठी मार्ग निघेल अशी आशा आहे, असे एका संघाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
वाचा- टेनिस कोर्टवर जाण्यासाठी सानिया मिर्झा आतूर
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा सरकारच्या आदेशाची वाट पाहत असल्याचे समजते. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्याने आयपीएल एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता कमीच आहे. नियोजित वेळेनुसार ही स्पर्धा २० मार्च ते २४ मे या काळात होणार होती.
वाचा- क्रिकेटपटूने विचारले, बेबी मैं क्या हूं तेरा
बीसीसीआयमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता ही स्पर्धा एप्रिल-मे मध्ये होण्याची शक्यता नाही. अर्थात बीसीसीआयकडून अद्याप यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने आयपीएलमधील ८ संघांना आणि प्रायोजकांना याची कल्पना दिली आहे.
वाचा- भारत-पाकिस्तान मालिका होणार नाही - गावस्कर
आयपीएलचा १३वा हंगाम स्थगित केला जात आहे रद्द नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आम्हाला आशा आहे की या वर्षाच्या अखेरीस आयपीएल होऊ शकेल. यासाठी मार्ग निघेल अशी आशा आहे, असे एका संघाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
वाचा- टेनिस कोर्टवर जाण्यासाठी सानिया मिर्झा आतूर
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा सरकारच्या आदेशाची वाट पाहत असल्याचे समजते. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्याने आयपीएल एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता कमीच आहे. नियोजित वेळेनुसार ही स्पर्धा २० मार्च ते २४ मे या काळात होणार होती.