दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील फायनल सामन्याला सुरुवात झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मेगा फायनलसाठी दोन्ही संघांनी कोणताही बदल केलेला नाही.
वाचा- चेन्नईने २०० धावा केल्या तरी विजयाची हमी नाही; KKR देऊ शकतो मोठा धक्का
कोणत्याही सामन्यात नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाचा ठरतो. या सामन्यात देखील तो फार म्हत्त्वाचा होता आणि तो केकेआरच्या बाजूने लागला. दुबईच्या मैदानावर आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात १२ लढती झाल्या आहेत आणि त्यापैकी ९ लढतीत दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. यामुळे चेन्नईविरुद्धच्या लढाईत केकेआरने अर्धी बाजी नाणेफेकीच्या कौलात मारली आहे. इतक नव्हे तर या हंगामात चेन्नईने साखळी फेरीत १४ पैकी ५ लढती गमावल्या आहेत. या पाचही लढती त्यांनी प्रथम फलंदाजी करताना गमावल्या आहेत. या उटल केकेआरने युएईमध्ये सहा लढती धावांचा पाठलाग करताना जिंकल्या आहेत.
वाचा- आजवर कोणाला न जमलेला वर्ल्ड रेकॉर्ड होणार; धोनी ठरणार जगातील पहिला...
दुबईची खेळपट्टी धीमी असली तरी ती फलंदाजीसाठी चांगली आहे. याचा फायदा दुसऱ्यांदा फलंदाजी करताना जास्त होतो. नाणेफेक झाल्यानंतर धोनीने देखील प्रथम गोलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली. पण आम्ही दोन्ही परिस्थितीसाठी तयार आहोत असे त्याने सांगितले.
वाचा- IPL फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव निश्चित; या एका गोष्टीचे धोनीकडे उत्तर नाही
चेन्नईसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे या मैदानावर त्यांनी साखळी फेरीत मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत सामना जिंकला होता. १९ सप्टेंबर रोजी झालेल्या त्या लढतीत चेन्नईने १५६ धावा केल्या होत्या आणि मुंबईला फक्त १३६ धावांवर रोखले होते. आज आयपीएलचे चौथे विजेतेपद मिळवायचे असेल तर चेन्नईला तशीच कामगिरी पुन्हा एकदा करावी लागले.
वाचा- चेन्नईने २०० धावा केल्या तरी विजयाची हमी नाही; KKR देऊ शकतो मोठा धक्का
कोणत्याही सामन्यात नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाचा ठरतो. या सामन्यात देखील तो फार म्हत्त्वाचा होता आणि तो केकेआरच्या बाजूने लागला. दुबईच्या मैदानावर आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात १२ लढती झाल्या आहेत आणि त्यापैकी ९ लढतीत दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. यामुळे चेन्नईविरुद्धच्या लढाईत केकेआरने अर्धी बाजी नाणेफेकीच्या कौलात मारली आहे. इतक नव्हे तर या हंगामात चेन्नईने साखळी फेरीत १४ पैकी ५ लढती गमावल्या आहेत. या पाचही लढती त्यांनी प्रथम फलंदाजी करताना गमावल्या आहेत. या उटल केकेआरने युएईमध्ये सहा लढती धावांचा पाठलाग करताना जिंकल्या आहेत.
वाचा- आजवर कोणाला न जमलेला वर्ल्ड रेकॉर्ड होणार; धोनी ठरणार जगातील पहिला...
दुबईची खेळपट्टी धीमी असली तरी ती फलंदाजीसाठी चांगली आहे. याचा फायदा दुसऱ्यांदा फलंदाजी करताना जास्त होतो. नाणेफेक झाल्यानंतर धोनीने देखील प्रथम गोलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली. पण आम्ही दोन्ही परिस्थितीसाठी तयार आहोत असे त्याने सांगितले.
वाचा- IPL फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव निश्चित; या एका गोष्टीचे धोनीकडे उत्तर नाही
चेन्नईसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे या मैदानावर त्यांनी साखळी फेरीत मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत सामना जिंकला होता. १९ सप्टेंबर रोजी झालेल्या त्या लढतीत चेन्नईने १५६ धावा केल्या होत्या आणि मुंबईला फक्त १३६ धावांवर रोखले होते. आज आयपीएलचे चौथे विजेतेपद मिळवायचे असेल तर चेन्नईला तशीच कामगिरी पुन्हा एकदा करावी लागले.