अ‍ॅपशहर

MI vs CSK : मुंबई इंडियन्सने पहिल्याच सामन्यात उडवली चेन्नईची दाणादाण, विजयासाठी माफक आव्हान...

पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या संघाला एकामागून एक जोरदार धक्के दिल्याचे पाहायला मिळाले. मुंबईच्या गोलंदाजांनी पहिल्याच पॉवर प्लेमध्ये चेन्नईच्या चार फलंदाजांना बाद करत त्यांचे कंबरडे मोडले.

Maharashtra Times 20 Sep 2021, 7:58 am
दुबई : मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची चांगलाच दाणादाण उडवल्याचे पाहायला मिळाले. मुंबईने यावेळी पहिल्या सहा षटकांमध्येच चेन्नईचे चार महत्वाचे फलंदाज बाद करत त्यांचे कंबरडे मोडल्याचे पाहायला मिळाले. पण त्यानंतर ऋतुराज गायकवाडने अर्धशतक झळकावत चेन्नईचा डाव सावरल्याचे पाहायला मिळाले. ऋतुराज आणइ ड्वेन ब्राव्हो यांनी अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली, त्यामुळेच चेन्नईला प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सपुढे १५७ धावांचे आव्हान ठेवता आले. ब्राव्होने यावेळी फक्त आठ चेंडूंत तीन षटकारांच्या जोरावर २३ धावा फटकावल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई इंडियन्स (सौजन्य- आयपीएल ट्विटर)

चेन्नईने यावेळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबईच्या गोलंदाजांनी त्यांचा निर्णय चुकीचा असल्याचे पहिल्याच पॉवर प्लेमध्ये दाखवून दिले. पहिल्याच षटकात मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने चेन्नईचा सलामीवीर फॅफ ड्यु प्लेसिसला बाद केले आणि चेन्नईला पहिला धक्का दिला. फॅफला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर अॅडम मिल्नेने दुसऱ्याच षटकात मोइन अलीला बाद केले आणि चेन्नईची २ बाद २ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर चेन्नईचा अंबाती रायुडू दुखापतग्रस्त झाला आणि त्यालाही मैदान सोडावे लागले. चेन्नईला यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण या दोघांनाही बोल्ट आणि मिल्ने जोडीने बाद केले. धोनीला यावेळी ३ तर रैनाला फक्त चार धावांवरच समाधान मानावे लागले. त्यावेळी चेन्नईची सहा षटकांमध्ये ४ बाद २४ अशी अवस्था झाली होती. पण महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने यावेळी चेन्नईला या परिस्थितीमधून बाहेर काढले.

चेन्नईचा संघ यावेळी लवकरच ऑल आऊट होणार, असे वाटत होते. पण यावेळी ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या संघाला सारवल्याचे पाहायला मिळाले. ऋतुराजने सुरुवातीला संथ सुरुवात केली असली तरी त्यानंतर त्याने धावा जमवायला सुरुवात केली. ऋतुराजने यावेळी अर्धशतक झळकावत संघाच्या धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न केला. ऋतुराजला यावेळी रवींद्र जडेजाकडून चांगली साथ मिळाल्याचे पाहायला मिळाले. रवींद्र जडेजाने यावेळी २६ धावा केल्या. जडेजा बाद झाल्यावरही ऋतुराज दमदार फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज