नवी दिल्ली : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाचा पहिला सामना हा २० सप्टेंबरला कोलकाता नाइट रायडर्सबरोबर होणार आहे. पण या पहिल्याच सामन्यात कोहली ब्रिगेडमध्ये एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रासाठी कोहली सज्ज झाला आहे. पण त्याचबरोबर आरसीबीच्या संघानेही जोरदार तयारी केली आहे. कारण पहिल्याच सामन्यात आरसीबीचा संघ हा निळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे. आरसीबीचा संघ हा लाल रंगाची जर्सी परीधान करतो, हे सर्वांनाच माहिती आहे. पण प्रत्येक आयपीएलमधील एका सामन्यात आरसीबीचा संघ हा हिरव्या रंगाची जर्सी परीधान करत असल्याचे सर्वांनी पाहिले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही गोष्ट आरसीबीचा संघ करत असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. पण यावेळी निळ्या जर्सीमध्ये आरसीबीचा संघ उतरणार आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये करोना वॉरियर्सने फारच मोलाचे काम केले आहे. त्यांच्या या योगदानाला सलाम करण्यासाठी आरसीबीचा संघ हा पहिल्याच सामन्यात निळी जर्सी परीधान करून उतरणार आहे.
विराटने संघातील फिरकीपटूला केला खास मेसेज...विराटने संघातील फिरकीपटू वानिंदु हसरंगाला एक खास मेसेज केला. या मेसेजमध्ये विराटने लिहिले आहे की, " युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी संघात बरेच बदल करण्यात आलेले आहेत. या संघात तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आपण या आयपीएलबाबत गेल्या महिन्यात सविस्तर बोललो होतो. पण आता तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. काही दिवसांतच क्वारंटाइनचा कालावधी संपणार असून आपण सर्व एकमेकांना भेटणार आहोत. मी तुम्हा सर्वांना कधी भेटणार, याची उत्सुकता मला लागलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच तुमच्या सर्वांनी मी भेट घेणार आहे." विराटने यावेळी संघातील नवीन खेळाडूंबरोबर संवाद साधल्याचे पाहायला मिळत आहे. आरसीबीच्या संघात यावेळी चार मोठे बदल करण्यात आले आहे. त्यामुळे जे महत्वाचे चार खेळाडू संघात आले आहेत त्यांच्यापैकी विराट कोहलीने हसरंगाबरोबर संवाद साधल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे.
विराटने संघातील फिरकीपटूला केला खास मेसेज...विराटने संघातील फिरकीपटू वानिंदु हसरंगाला एक खास मेसेज केला. या मेसेजमध्ये विराटने लिहिले आहे की, " युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी संघात बरेच बदल करण्यात आलेले आहेत. या संघात तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आपण या आयपीएलबाबत गेल्या महिन्यात सविस्तर बोललो होतो. पण आता तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. काही दिवसांतच क्वारंटाइनचा कालावधी संपणार असून आपण सर्व एकमेकांना भेटणार आहोत. मी तुम्हा सर्वांना कधी भेटणार, याची उत्सुकता मला लागलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच तुमच्या सर्वांनी मी भेट घेणार आहे." विराटने यावेळी संघातील नवीन खेळाडूंबरोबर संवाद साधल्याचे पाहायला मिळत आहे. आरसीबीच्या संघात यावेळी चार मोठे बदल करण्यात आले आहे. त्यामुळे जे महत्वाचे चार खेळाडू संघात आले आहेत त्यांच्यापैकी विराट कोहलीने हसरंगाबरोबर संवाद साधल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे.