अ‍ॅपशहर

IPL Final आज उशिरा सुरु होणार, जाणून घ्या वेळ आणि फायनलच्या नियमांचे सर्व अपडेट्स

आयपीएलचे आतापर्यंतचे सामने हे रात्री ७..३० वाजता सुरु होत होते, पण आता आयपीएलचा अंतिम सामना आता उशिराने सुरु होणार असल्याचे समोर येत आहे. आयपीएलचा हा अंतिम सामना आता किती वाजता सुरु होणार, याबाबत नवीन अपडेट्स समोर आले आहेत. त्याचबरोबर फायनलसाठी आता काही नवीन नियम बनवण्यात आले आहे. सर्व गोष्टी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 29 May 2022, 6:19 pm
अहमदाबाद : आयपीएलचाअंतिम सामना आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये होणार आहे. पण आजचा सामना हा रोजच्या वेळेनुसार सुरु होणार नाही. आज होणारा अंतिम सामना हा उशिराने सुरु होणार आहे. आयपीएल फायनच्या वेळाबाबत आता एक नवीन अपटेड समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम आयपीएल फायनल

आयपीएलची फायनल किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या...आयपीएलची फाययनल नेमकी कशी होणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्याचबरोबर ही फायनल नेमकी कधी सुरु होणार, याची उत्सुकताही सर्वांना आहे. कारण यावेळी फायनलचा सामना सुरु करण्याची वेळ बदलण्यात आली आहे. कारण आयपीएलच्या अंतिम सामन्याआधी सुरू होणारी क्लोजिंग सेरेमनी ५५ मिनिटांचा कार्यक्रम असणार आहे. हा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी ६.२५ वाजता सुरू होणार आहे. तुम्ही स्टार स्पोर्ट्स किंवा डिझ्नी प्लस हॉटस्टारवर हा क्लोजिंग सेरेमनीचा सोहळा पाहू शकता. यावर्षी हा कार्यक्रम पुन्हा आयोजित करण्यात आला असून यामध्ये बॉलिवूडमधील कलाकारांची रेलचेल असणार आहे. ऑस्कर विजेते संगीतकार-गायक एआर रहमान, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि गायिका नीती मोहन यावेळी परफॉर्म करणार आहे. नीती मोहन आणि एआर रेहमान स्टेडियममध्ये दाखल झाले असून त्यांची तयारी सुरू आहे. हा कार्यक्रम ७.२० पर्यंत सुरु राहील, असे म्हटले जात आहे. पण त्यानंतर १० मिनिटांचा ब्रेक देण्यात येणार आहे. या ब्रेकनंतर ७.३० मिनिटांनी टॉस करण्यात येणार आहे. टॉस झाल्यावर अर्ध्या तासाने म्हणजेच रात्री ८..०० वाजता अंतिम फेरीचा सामना सुरु होणार आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या फायनलसाठी काही नियमही बनवण्यात आले आहेत. पावसाचा व्यत्यय आला तर किती षटकांचे सामने खेळवायचे, यामध्ये सुपर ओव्हरचाही पर्याय आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी जर सामना होऊ शकला नाही तर त्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आयपीएल फायनलसाठी जोरदार तयारी बीसीसीआयने केली आहे. त्यामुळे आता कोणता संघ विजेतेपद पटकावणार, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज