अ‍ॅपशहर

मुंबई इंडियन्सचा पराभव करताना लखनौने केली चूक; कर्णधारासह संघ अडचणीत

आयपीएलच्या १५व्या हंगामात रविवारी झालेल्या लढतीत लखनौने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने शतकी खेळी केली. पण सामना झाल्यानंतर त्याला दंड देखील करण्यात आला.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2022, 1:42 pm
मुंबई: लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल २०२२मध्ये झालेल्या ३७व्या लढतीत मुंबई इंडियन्सचा ३६ धावांनी पराभव केला. यासामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने शतकी खेळी केली. पण सामना झाल्यानंतर त्याला दंड देखील करण्यात आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम लखनौ सुपर जायंट्स
Lucknow Super Giants


वाचा- मुंबई इंडियन्सला अजून प्लेऑफची संधी आहे का? जाणून घ्या समीकरण

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सर्व काही लखनौ संघाच्या मनासारखे झाले. नाणेफेक भलेही मुंबईने जिंकली असली तरी त्यानंतर लखनौने कर्णधाराच्या शतकाच्या जोरावर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. राहुलने ६२ चेंडूत नाबाद १०३ धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजांच्या जोरावर मुंबईला फक्त १३२ धावात रोखले. पण लखनौकडून एक चुक झाली, त्यांनी धीम्यागतीने गोलंदाजी केली. ज्याचा दणका कर्णधार आणि संघाला बसला. आयपीएलच्या नियमानुसार दुसऱ्यांदा अशी चुक केल्याने राहुलला २४ लाख तर संघातील प्रत्येक खेळाडूला ६ लाख रुपय इतका दंड करण्यात आला आहे.

वाचा- मुंबईच्या पराभवानंतर चाहत्यांना आली बाबर आझमची आठवण, पाक संघाचे IPL...

आयपीएल २०२२ मध्ये अशी चूक करण्याची लखनौची ही दुसरी वेळ आहे आणि यामुळेच आता मोठा धोका त्यांच्यासमोर आहे. जर संघाने ही चूक पुन्हा केली तर कर्णधारावर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते. याआधी १६ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात लखनौने अशीच चूक केली होती. तेव्हा राहुलला १२ लाखांचा दंड झाला होता. तर १९ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात लखनौचा १८ धावांनी पराभव झाला होता. या सामन्यात राहुलने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला मॅच फीच्या २० टक्के तर आणि मार्कस स्टोयनिसला फटकारण्यात आले होते.

वाचा- मुंबई इंडियन्सनंतर चेन्नईचा नंबर? पंजाबविरुद्धच्या आजच्या लढतीत...

IPL 2022मध्ये लखनौ सुपर जायंट्स

गुजरातकडून ५ विकेटनी पराभव
चेन्नईविरुद्ध ६ विकेटनी विजय
हैदराबादविरुद्ध १२ धावांनी विजय
दिल्लीविरुद्ध ६ विकेटनी विजय
राजस्थानकडून ३ धावांनी पराभव
मुंबईविरुद्ध १८ धावांनी विजय
बेंगळुरूकडून १८ धावांनी पराभव
मुंबई विरुद्ध ३६ धावांनी विजय
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख