मुंबई: आयपीएल २०२२ चा ६८ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने राजस्थानसमोर १५१ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात राजस्थानने यशस्वी जयस्वालचे शानदार अर्धशतक आणि आरअश्विनच्या नाबाद ४० धावांच्या खेळीच्या जोरावर १९.४ षटकात पूर्ण केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा केली. बटलर ५ चेंडूत अवघ्या २ धावा करून तो सिमरजीत सिंहचा बळी ठरला. उल्लेखनीय म्हणजे बटलर मागील ३ डावात दुहेरी आकडा पार करण्यात अपयशी ठरला आहे, तर गेल्या ५ सामन्यांमध्ये त्याने ३० पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. वाचा - राजस्थानने अखेरच्या षटकात विजय मिळवल्यामुळे गुणतालिकेत कोणते झाले मोठे बदल, जाणून घ्या...
जॉस बटलरने स्पर्धेची चांगली सुरुवात केली आणि पहिल्या ७ सामन्यात तीन शतके आणि तीन अर्धशतकांसह ४९१ धावा केल्या. यामुळे एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा विक्रम तो मोडू शकतो असे त्यावेळी मानले जात होते. कोहलीने २०१६ मध्ये चार शतकांसह सर्वाधिक ९७३ धावा केल्या होत्या. कदाचित हाच विचार जोस बटलरच्याही मनात असेल, पण गेल्या ७ सामन्यांत बटलरचा फॉर्मने तळ गाठले आहे. बटलरने त्याच्या शेवटच्या ७ सामन्यात १९.७१ च्या सरासरीने आणि १११.२९ च्या स्ट्राइकरेटने केवळ १३८ धावा केल्या आहेत. विराट कोहलीचा आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम मोडण्याच्या दबावाने असे झाले का? असे प्रश्नही सध्या उपस्थित केले जात आहेत.
वाचा - चेन्नईच्या अखेरच्या सामन्यात धोनीचा मोठा गौप्यस्फोट, आयपीएलबाबत घेतला मोठा निर्णय
दरम्यान, लीग स्टेजच्या अखेरीस बटलरच्या फॉर्ममध्ये घसरण झाल्याने राजस्थान रॉयल्सची डोकेदुखी निश्चितच वाढली असेल. राजस्थान रॉयल्सला त्यांच्या धडाकेबाज सलामीवीराने प्ले ऑफमध्ये अशी फलंदाजी करावी असे वाटत नाही. राजस्थान रॉयल्स प्ले ऑफमध्ये पोहोचणार तिसरा संघ ठरला आहे. रॉयल्सने अखेरीस २०१८ मध्ये अंतिम चार फेरी गाठली होती. अशा परिस्थितीत आता २००८ नंतर राजस्थान रॉयल्सला आपले दुसरे विजेतेपद मिळवायचे असेल तर बटलरचे लयीत परतणे अत्यंत गरजेचे आहे.
जॉस बटलरने स्पर्धेची चांगली सुरुवात केली आणि पहिल्या ७ सामन्यात तीन शतके आणि तीन अर्धशतकांसह ४९१ धावा केल्या. यामुळे एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा विक्रम तो मोडू शकतो असे त्यावेळी मानले जात होते. कोहलीने २०१६ मध्ये चार शतकांसह सर्वाधिक ९७३ धावा केल्या होत्या. कदाचित हाच विचार जोस बटलरच्याही मनात असेल, पण गेल्या ७ सामन्यांत बटलरचा फॉर्मने तळ गाठले आहे. बटलरने त्याच्या शेवटच्या ७ सामन्यात १९.७१ च्या सरासरीने आणि १११.२९ च्या स्ट्राइकरेटने केवळ १३८ धावा केल्या आहेत. विराट कोहलीचा आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम मोडण्याच्या दबावाने असे झाले का? असे प्रश्नही सध्या उपस्थित केले जात आहेत.
वाचा - चेन्नईच्या अखेरच्या सामन्यात धोनीचा मोठा गौप्यस्फोट, आयपीएलबाबत घेतला मोठा निर्णय
दरम्यान, लीग स्टेजच्या अखेरीस बटलरच्या फॉर्ममध्ये घसरण झाल्याने राजस्थान रॉयल्सची डोकेदुखी निश्चितच वाढली असेल. राजस्थान रॉयल्सला त्यांच्या धडाकेबाज सलामीवीराने प्ले ऑफमध्ये अशी फलंदाजी करावी असे वाटत नाही. राजस्थान रॉयल्स प्ले ऑफमध्ये पोहोचणार तिसरा संघ ठरला आहे. रॉयल्सने अखेरीस २०१८ मध्ये अंतिम चार फेरी गाठली होती. अशा परिस्थितीत आता २००८ नंतर राजस्थान रॉयल्सला आपले दुसरे विजेतेपद मिळवायचे असेल तर बटलरचे लयीत परतणे अत्यंत गरजेचे आहे.