अ‍ॅपशहर

दिल्लीच्या विजयाने प्लेऑफचे समीकरण बदलले; ३ जागा आणि ८ संघ स्पर्धेत

आयपीएलच्या १५व्या हंगामात साखळी फेरीतील ५८ लढती झाल्या आहेत, तरी अद्याप प्लेऑफमध्ये कोणते चार संघ जातील याचा निर्णय अद्याप झालेला नाही. दिल्लीने राजस्थानवर मिळवलेल्या विजयानंतरचे प्लेऑफचे समीकरण जाणून घ्या.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 May 2022, 9:08 am
मुंबई: आयपीएल २०२२मध्ये झालेल्या ५८व्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर ८ विकेटनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत राजस्थाने १६० धावा केल्या होत्या. दिल्लीने हे लक्ष्य २ विकेट आणि ८ चेंडू राखून पार केले. प्लेऑफच्या शर्यतीत कायम दिल्लीला या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Delhi Capitals
दिल्ली कॅपिटल्स


वाचा- IPLच्या इतिहासात सचिननंतर अशी कामगिरी प्रथमच झाली

दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी राजस्थानचे पारडे जड वाटत होते. प्रत्यक्षात दिल्लीने कमाल केली आणि गुणतक्त्यात देखील मोठा फेरबदल केला. दिल्लीच्या या विजयामुळे प्लेऑफची शर्यत आणखी रंजक झाली आहे.

गुणतक्त्यात गुजरात टायटन्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. गुजरातचे १८ गुण असून त्यांनी प्लेऑफमधील स्थान निश्चित केले आहे. दुसऱ्या स्थानावर लखनौ सुपर जायंट्स, तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स, चौथ्यावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, पाचव्यावर दिल्ली कॅपिटल्स, सहाव्या स्थानावर सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स सातव्या, पंजाब किंग्ज आठव्या तर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स अनुक्रमे ९व्या आणि १०व्या स्थानावर आहेत.

वाचा- विजेतेपद मिळवल्यानंतर पाहा कसली ट्रॉफी दिली जाते; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली असली तरी प्लेऑफमध्ये एकच संघाने स्थान निश्चित केले आहे आणि ३ जागांसाठी एक दोन नव्हे तर ८ संघ स्पर्धेत आहेत. गुणतक्त्यात ९व्या क्रमांकावर असलेला चेन्नईचा संघ देखील प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो. दिल्लीविरुद्धच्या पराभवाने राजस्थान रॉयल्सचे टेन्शन वाढले आहे. गेल्या ४ सामन्यातील हा त्यांचा तिसरा पराभव ठरलाय.

IPL २०२२चा ताजा गुणतक्ता पाहा

दिल्लीला अजून दोन सामने खेळायचे आहेत. या दोन्हीत विजय मिळवल्यास आणि नेट रनरेट चांगले ठेवल्यास दिल्ली प्लेऑफमध्ये पोहोचू शकते. राजस्थानचे १२ सामन्यात १४ गुण आहेत. त्यांनी देखील शिल्लक दोन लढतीत विजय मिळवल्यास प्लेऑफचे तिकिट मिळू शकले. जर दोन्ही संघांनी उर्वरीत २ सामन्यात फक्त एक विजय मिळवला तर त्यांना अन्य संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागले.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज