अ‍ॅपशहर

KKR vs DC : कोलकाताने दिल्लीची हवाच काढली, फायनलमध्ये पोहोचण्यासाठी फक्त एक पाऊल दूर...

कोलकाता नाइट रायडर्सने या सामन्यात नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी स्विकारली आणि त्यांनी दिल्लीच्या संघाची चांगलीच दाणादाण उडवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता फायलपासून ते फक्त एक पाऊल दूर असल्याचे म्हटले जात आहे.

Maharashtra Times 14 Oct 2021, 8:17 am
शारजा : या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची जोरदार हवा होती. पण या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी ही हवाच काढून टाकल्याचे पाहायला मिळाले. कारण केकेआरच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या धावांवर चांगलाच अंकुश ठेवल्याचे पाहायला मिळाले. केकेआरच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा केला आणि त्यामुळेच दिल्लीला केकेआरपुढे विजयासाठी १३६ धावांचे माफक आव्हान ठेवता आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम केकेआर (सौजन्य-आयपीएल ट्विटर)


कोलकाताच्या संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि कर्णधार इऑन मॉर्गनने यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॉर्गनचा हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी योग्य असल्याचे दाखवून दिले. कारण दिल्लीच्या धडाकेबाज फलंदाजांवर केकेआरच्या गोलंदाजांनी यावेळी अंकुश ठेवल्याचे पाहायला मिळाले. गेल्या सामन्यात पृथ्वी शॉ चांगलाच चमकला होता. पण यावेळी त्याला १८ धावाच करता आल्या. पण वरुण चक्रवर्तीने यावेळी पृथ्वीला बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. केकेआरच्या गोलंदाजांनी यावेळी तिखट मारा करत दिल्लीच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारायची संधीच दिली नाही.

दिल्लीच्या धाव होत नसल्याचे पाहून शिखर धवनने खेळपट्टीवर ठाण मांडायचे ठरवले होते. पण स्थिरस्थावर झाल्यावरही धवनला मोठी खेळी साकारता आली नाही. धवनने यावेळी ३९ चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३६ धावा केल्या. केकेआरचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने हा केकेआरला दुसरा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. वरुणने यावेळी दिल्लीच्या पृथ्वी आणि शिखर या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यामुळेच दिल्लीला मोठी धावसंख्या उभारता आली नसल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतही यावेळी अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण पंतला यावेळी फक्त सहा धावांवरच समाधान मानावे लागले. केकेआरचा संघ हा फिरकीपटूंसाठी जास्त ओळखला जातो. पण या सामन्यात लुकी फर्ग्युसन आणि शिवम मावी यांनी सुरुवातीला भेदक गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच दिल्लीच्या संघाला मोठी फटकेबाजी करता आली नाही. त्यामुळे केकेआरच्या गोलंदाजांनी आपली भूमिका चोख निभावली आहे, त्यामुळे आता त्यांचे फलंदाज संघाला फायनलमध्ये पोहोचवणार का, याची उत्सुकता सर्वांना असेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज