अ‍ॅपशहर

हैदराबादला आयपीएलबाहेर काढण्यासाठी केकेआरने रचला विजयाचा पाया, पाहा किती धावा उभारल्या...

केकेआर आणि हैदराबाद यांच्यातील सामना हा चांगलाच रंगदार अवस्थेत आहे. केकेआरने यावेळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरसाठी अजिंक्य रहाणे आणि नितिष राणा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण उमरान मलिकने यावेळी अचूक आणि भेदक मारा करत केकेआरच्या धावसंख्येला खीळ बसवण्याचा प्रयत्न केला. केकेआरने हैदराबादपुढे किती धावांचे आव्हान ठेवले, पाहा...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 14 May 2022, 9:23 pm
पुणे : परिस्थिती कितीही बिकट असली तरी मागे हटायचे नाही, हे केकेआरच्या संघाने आज पुन्हा एकदा दाखवून दिले. हैदराबादच्या संघाने सुरुवातीला भेदक मारा करत केकेआरचा अर्धा संघ गारद केला होता. त्यावेळी केकेआरचा संघ कोलमडून जाईल, असे वाटत होते. पण त्यावेळी केकेआरच्या आंद्रे रसेल आणि सॅम बिलिंग्स यांनी हार मानली नाही आणि संघाला मोठी धावसंख्या उभारत हैदराबादला आयपीएल बाहेर काढण्याचा पाया रचला. बिलिंग्स यावेळी ३४ धावांवर बाद झाला असला तरी रसेलने अखेरपर्यंत किल्ला लढवत दमदार फटकेबाजी केली. त्यामुळेच केकेआरच्या संघाला यावेळी हैदराबादपुढे १७८ धावांचे आव्हान ठेवता आले. रसेलने यावेळी २८ चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ४९ धावांची खेळी साकारली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम केकेआर वि. हैदराबाद (सौजन्य-आयपीएल ट्विटर)

केकेआरच्या संघाने यावेळी आयपीएलमध्ये प्रयोग करताना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण केकेआरच्या संघाला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. वेंकटेश अय्यरच्या रुपात केकेआरला यावेळी पहिला धक्का बसला, त्याला सात धावा करता आल्या. पहिला धक्का बसल्यावर अजिंक्य रहाणे आणि नितिष राणा यांनी केकेआरचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने यावेळी राणा आणि रहाणे या दोघांनाही बाद केले आणि केकेआरला हादरा दिला. नितिष राणाने केकेआरचा डाव सारवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. राणाने यावेळी २६ धावा केल्या. राणा बाद झाल्यावर केकेआरच्या संघाची जबाबदारी ही अजिंक्यच्या खांद्यावर होती. अजिंक्य रहाणेकडून अजिंक्यला मोठ्या आशा होत्या, पण अजिंक्यला सेट झाल्यावरही मोठी खेळी साकारण्यात अपयश आहे. अजिंक्यला २८ धावा करता आल्या. उमरान मलिकने त्यानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरला बाद केले आणि केकेआरचे कंबरडे मोडले. कारण त्यानंतर केकेआरची धावगती मंदावल्याचे पाहायला मिळाले. केकेआरचा अर्धा संघ गारद झाला तेव्हा त्यांची ५ बाद ९४ अशी स्थिती होती. त्यानंतर सॅम बिलिंग्स आणि आंद्रे रसेल यांनी केकेआरचा डाव सावरला आणि संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. सॅम आणि रसेल यांनी अखेरच्या षटकांमध्ये केकेआरचा धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारी चोख बजावली.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज