अ‍ॅपशहर

कोहलीचे शतक पण तरीही मुंबई या एका गोष्टीमुळे Playoffs मध्ये जाऊ शकते, जाणून घ्या कारण

Playoffs : मुंबईचा संघ प्ले ऑफमध्ये कसा दाखल होऊ शकतो, याचे एकमेव समीकरण आता समोर आले आहे. त्यामुळे आता जर मुंबईला प्ले ऑफमध्ये जायचे असेल तर ही एकच गोष्ट महत्वाची ठरणार आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 21 May 2023, 10:12 pm
नवी दिल्ली : विराट कोहलीने धडाकेबाज फटकेबाजी करत शतक झळकावले. त्यामुळे आरसीबीने आता प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १९७ अशी मजल मारली आहे. त्यामुळे आता जर मुंबई इंडियन्सच्या संघाला प्ले ऑफमध्ये जायचे असेल तर फक्त एक गोष्ट त्यांना बाद फेरीत घेऊन जाऊ शकते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mumbai Indians And RCB


आयपीएलच्या प्ले ऑफचं गणित आता स्पष्ट झाले आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या अखेरच्या आणि करो या मरो सामन्यात दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे मुंबई इंडियन्सने आता आपल्या संपूर्ण १४ लढतींमध्ये आठ विजय मिळवले आहेत, तर त्यांना सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. पण आता आठ विजयांसह त्यांचे आता १६ गुण झाले आहेत. य विजयासह त्यांनी चौथे स्थान पटकावले होते. आयपीएलमधील पहिले चार संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरत असतात. पण मुंबईचा संघ चौथ्या स्थानावर गेला असला तरी आरसीबीचा सामना अजून बाकी आहे. आता मुंबई किंवा आरसीबी या दोघांपैकी एकच संघ प्ले ऑफमध्ये जाऊ शकतो आणि त्यासाठी आता रनरेट हा महत्वाचा नसेल. त्यामुळे आता फक्त एकच गोष्ट महत्वाची असेल आणि ती म्हणजे आरसीबी जिंकते की हरते. आरसीबीने जर हा सामना जिंकला तर ते प्ले ऑफमध्ये जातील आणि मुंबईचे आव्हान संपुष्टात येईल. पण दुसरीकडे जर आरसीबीने हा सामना गमावला तर ते स्पर्धेच्या बाहेर जातील आणि मुंबई इंडियन्सचा संघ हा प्ले ऑफमध्ये दाखल होईल. त्यामुळे आता आरसीबीचा संघ पराभूत झाला तरच मुंबईचा संघ हा प्ले ऑफमध्ये दाखल होऊ शकतो, हे एकच समीकरण आहे. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांसाठी आता आरसीबीचा पराभव हा महत्वाचा असेल आणि त्यासाठी त्यांनी आपले देव पाण्यात ठेवले असतील. त्यामुळे या सामन्यात नेमकं काय होतं, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये आता गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे तीन संघ पोहोचले आहेत.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज