मुंबई: आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सचा आणखी एक पराभव झाला. आज (१६ एप्रिल) झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने त्यांचा १८ धावांनी पराभव केला. लखनौने कर्णधार केएल राहुलच्या नाबाद शतकाच्या जोरावर मुंबईला २०० धावांचे आव्हान दिले होते. मात्र मुंबईला पुन्हा एकदा धावांचा पाठलाग करण्यात अपयश झाले. या विजयासह लखनौ संघाने गुणतक्त्यातील चौथे स्थान मिळवले.
वाचा- अर्जुनचे पदार्पण आयत्या वेळी बदलले; रोहित शर्माच्या मास्टर प्लॉनला यश
विजयासाठी २०० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा फक्त ६ धावांवर बाद झाला. त्याच्या जागी आलेल्या डेवाल्ड ब्रेविसने ईशान किशन सोबत वेगाने धावा केल्या, पण मुंबईच्या अर्धशतकानंतर हे दोन्ही फलंदाज एका पाठोपाठ एक बाद झाले. ब्रेविस १३ चेंडूत १ षटकार आणि ६ चौकारांसह ३१ धावांवर बाद झाला. तर ईशान किशन १७ चेंडूत १३ धावा करून माघारी परतला. यामुळे मुंबईचा अवस्था ३ बाद ५७ अशी झाली. दोन महत्त्वाचे फलंदाजी बाद झाल्यावर त्यांची जागा सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी घेतली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. तिलक वर्मा २६ धावांवर बाद झाला. त्याला जेसन होल्डरने बाद केले. तर १६व्या षटकात मुंबईला मोठा झटका बसाल. रवी बिश्नोईने सूर्यकुमार यादवला बाद केले. सूर्यकुमारने २७ चेंडूत ३७ धावा केल्या.
वाचा- अर्जुन तेंडुलकर नव्हे तर रोहित शर्माने स्टार ऑलराउंडरला दिले स्थान
सूर्यकुमार बाद झाल्यानंतर जयदेव उनाडकट मैदावर आला. त्याने पोलार्डसह मुंबईला अखेरच्या षटकापर्यंत नेले. जयदेवने ६ चेंडूत १४ धावा केल्या. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी २६ धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर जयदेव धावबाद झाला. त्याच्या जागी आलेल्या मुरुगन अश्विनने दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला. पण तिसऱ्या चेंडूवर तो धावबाद झाला. चौथ्या चेंडूवर पोलार्डला धाव घेता आली नाही. पाचव्या चेंडूवर तो बाद देखील झाला आणि मुंबईने सामना देखील गमावला.
वाचा- रग्बी मैदानावर ती का आली टॉपलेस, पाहा व्हिडिओ
त्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या डावाची सुरूवात राहुल आणि क्विंडन डी कॉक यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५२ धावा केल्या. मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या फॅबियन एॅलनने सहाव्या षटकात डी कॉकला २४ धावांवर बाद केले आणि पहिले यश मिळवले. डी कॉकच्या जागी आलेल्या मनिष पांडेने कर्णधार राहुलसोबत अर्धशतकी भागिदारी केली आणि संघाला १००च्या पुढे नेले. लखनौने १० षटकात ९४ धावा केल्या होत्या. मुरुगन अश्विनने पांडेला ३८ धावांवर माघारी पाठवले. १७व्या षटकात उनाडकटने मार्कस स्टॉइनिसला १० तर २०व्या षटकात दिपक हुड्डाला १५ धावांवर बाद केले. केएल राहुलला शतक करण्यासाठी अखेरच्या चेंडूवर १ धाव हवी होती. त्याने उनाडकटला चौकार मारला आणि शतक पूर्ण केले. लखनौकडून राहुल वगळता अन्य फलंदाजांना फार मोठी धावसंख्या करता आली नाही. मुंबईकडून उनाडकटने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. अश्विनने आणि फॅबियनने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
वाचा- अर्जुनचे पदार्पण आयत्या वेळी बदलले; रोहित शर्माच्या मास्टर प्लॉनला यश
विजयासाठी २०० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा फक्त ६ धावांवर बाद झाला. त्याच्या जागी आलेल्या डेवाल्ड ब्रेविसने ईशान किशन सोबत वेगाने धावा केल्या, पण मुंबईच्या अर्धशतकानंतर हे दोन्ही फलंदाज एका पाठोपाठ एक बाद झाले. ब्रेविस १३ चेंडूत १ षटकार आणि ६ चौकारांसह ३१ धावांवर बाद झाला. तर ईशान किशन १७ चेंडूत १३ धावा करून माघारी परतला. यामुळे मुंबईचा अवस्था ३ बाद ५७ अशी झाली. दोन महत्त्वाचे फलंदाजी बाद झाल्यावर त्यांची जागा सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी घेतली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. तिलक वर्मा २६ धावांवर बाद झाला. त्याला जेसन होल्डरने बाद केले. तर १६व्या षटकात मुंबईला मोठा झटका बसाल. रवी बिश्नोईने सूर्यकुमार यादवला बाद केले. सूर्यकुमारने २७ चेंडूत ३७ धावा केल्या.
वाचा- अर्जुन तेंडुलकर नव्हे तर रोहित शर्माने स्टार ऑलराउंडरला दिले स्थान
सूर्यकुमार बाद झाल्यानंतर जयदेव उनाडकट मैदावर आला. त्याने पोलार्डसह मुंबईला अखेरच्या षटकापर्यंत नेले. जयदेवने ६ चेंडूत १४ धावा केल्या. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी २६ धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर जयदेव धावबाद झाला. त्याच्या जागी आलेल्या मुरुगन अश्विनने दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला. पण तिसऱ्या चेंडूवर तो धावबाद झाला. चौथ्या चेंडूवर पोलार्डला धाव घेता आली नाही. पाचव्या चेंडूवर तो बाद देखील झाला आणि मुंबईने सामना देखील गमावला.
वाचा- रग्बी मैदानावर ती का आली टॉपलेस, पाहा व्हिडिओ
त्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या डावाची सुरूवात राहुल आणि क्विंडन डी कॉक यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५२ धावा केल्या. मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या फॅबियन एॅलनने सहाव्या षटकात डी कॉकला २४ धावांवर बाद केले आणि पहिले यश मिळवले. डी कॉकच्या जागी आलेल्या मनिष पांडेने कर्णधार राहुलसोबत अर्धशतकी भागिदारी केली आणि संघाला १००च्या पुढे नेले. लखनौने १० षटकात ९४ धावा केल्या होत्या. मुरुगन अश्विनने पांडेला ३८ धावांवर माघारी पाठवले. १७व्या षटकात उनाडकटने मार्कस स्टॉइनिसला १० तर २०व्या षटकात दिपक हुड्डाला १५ धावांवर बाद केले. केएल राहुलला शतक करण्यासाठी अखेरच्या चेंडूवर १ धाव हवी होती. त्याने उनाडकटला चौकार मारला आणि शतक पूर्ण केले. लखनौकडून राहुल वगळता अन्य फलंदाजांना फार मोठी धावसंख्या करता आली नाही. मुंबईकडून उनाडकटने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. अश्विनने आणि फॅबियनने प्रत्येकी एक विकेट मिळवली.