मुंबई : मुंबई इंडियन्सचा संघ आता आयपीएलच्या बाहेर पडला आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण आयपीएलमधील आव्हान संपल्यानंतरही मुंबईचा संघ आता स्पर्धेत मोठा उलटफेर करू शकतो. मुंबई इंडियन्सची आता रणनिती ठरलेली आहे. त्यामुळे स्पर्धेबाहेर जाऊनही मुंबईचे सामना सर्वांसाठी महत्वाचे ठरणार आहेत.
मुंबई इंडियन्सचा संघ नेमकं करणार तरी काय, पाहा...मुंबईच्या संघाचे आययपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे, पण त्यांचे स्पर्धेतील वजन मात्र अजूनही कमी झालेले नाही. मुंबईच्या संघाने पहिला विजय मिळवल्यानंतर इशान किशनने एक महत्वाची गोष्ट सांगितली होती. इशान म्हणाला होता की, " आता आम्ही फक्त आमच्या आनंदासाठी खेळणार आहोत. पण दुसरीकडे आमचे सामने निरर्थक होणार नाहीत तर, आमच्या सामन्यांमुळे आता स्पर्धेत अधिक चुरस निर्माण होणार आहे." इशानचे हे वक्तव्य पाहिले तर त्यामधून मुंबई इंडियन्सचा संघ आता नेमकं काय करणार आहे, हे जवळपास स्पष्ट होऊ शकते. मुंबई इंडियन्सचे पाच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे या पाचही सामन्यांमध्ये विजय मिळवल्यावर त्यांना कोणताही फरक पडणार नाही. पण दुसरीकडे ज्या संघाविरुद्ध ते खेळणार आहेत त्यांच्यावर मात्र या सामन्यांचा नक्कीच फरक पडणार आहे. कारण आता प्ले ऑफची शर्यत जोरदार सुरु झाली आहे. आतापर्यंत फक्त एकच संघ प्ले ऑफमध्ये पोहोचलेला आहे. त्यामुळे बाकीच्या आठही संघांना आता उर्वरीत सामन्यांमध्ये विजय मिळवणे महत्वाचे असेल. त्यामुळे मुंबईचा संघ बाहेर गेला असला तरी तो अन्य संघांचे आव्हानही संपुष्टात आणू शकते. त्यामुळे सध्याच्या घडीला मुंबईचा संघ हा स्पर्धेबाहेर गेला असला तरी तोच सर्वात धोकादायक आहे. एकदा मुंबईचा संघ जिंकला की त्यानंतरचे सामने तो एकामागून एक जिंकत जातो, हे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. त्यामुळे मुंबईने जर उर्वरीत सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना धक्के दिले तर बऱ्याच संघाचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाबरोबर खेळताना जर कोणता संघ गाफिल राहीला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे आता मुंबईचा संघ आयपीएलमध्ये कोणता उलटफेर करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल.
मुंबई इंडियन्सचा संघ नेमकं करणार तरी काय, पाहा...मुंबईच्या संघाचे आययपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे, पण त्यांचे स्पर्धेतील वजन मात्र अजूनही कमी झालेले नाही. मुंबईच्या संघाने पहिला विजय मिळवल्यानंतर इशान किशनने एक महत्वाची गोष्ट सांगितली होती. इशान म्हणाला होता की, " आता आम्ही फक्त आमच्या आनंदासाठी खेळणार आहोत. पण दुसरीकडे आमचे सामने निरर्थक होणार नाहीत तर, आमच्या सामन्यांमुळे आता स्पर्धेत अधिक चुरस निर्माण होणार आहे." इशानचे हे वक्तव्य पाहिले तर त्यामधून मुंबई इंडियन्सचा संघ आता नेमकं काय करणार आहे, हे जवळपास स्पष्ट होऊ शकते. मुंबई इंडियन्सचे पाच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे या पाचही सामन्यांमध्ये विजय मिळवल्यावर त्यांना कोणताही फरक पडणार नाही. पण दुसरीकडे ज्या संघाविरुद्ध ते खेळणार आहेत त्यांच्यावर मात्र या सामन्यांचा नक्कीच फरक पडणार आहे. कारण आता प्ले ऑफची शर्यत जोरदार सुरु झाली आहे. आतापर्यंत फक्त एकच संघ प्ले ऑफमध्ये पोहोचलेला आहे. त्यामुळे बाकीच्या आठही संघांना आता उर्वरीत सामन्यांमध्ये विजय मिळवणे महत्वाचे असेल. त्यामुळे मुंबईचा संघ बाहेर गेला असला तरी तो अन्य संघांचे आव्हानही संपुष्टात आणू शकते. त्यामुळे सध्याच्या घडीला मुंबईचा संघ हा स्पर्धेबाहेर गेला असला तरी तोच सर्वात धोकादायक आहे. एकदा मुंबईचा संघ जिंकला की त्यानंतरचे सामने तो एकामागून एक जिंकत जातो, हे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. त्यामुळे मुंबईने जर उर्वरीत सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना धक्के दिले तर बऱ्याच संघाचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाबरोबर खेळताना जर कोणता संघ गाफिल राहीला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे आता मुंबईचा संघ आयपीएलमध्ये कोणता उलटफेर करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल.