अ‍ॅपशहर

विराट कोहलीनंतर कोण होणार RCBचा कर्णधार; मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंच्या नावांची जोरदार चर्चा

ए.बी. डिव्हिलियर्सला कर्णधार केलं तर तुम्ही किती वर्षे खेळू शकता? म्हणूनच मला अशी एखादी व्यक्ती हवी आहे, ज्याच्याकडे संघ बांधणीसाठी कमीतकमी तीन वर्षे असतील.

Lipi 26 Sep 2021, 5:57 pm
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL)मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचं नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीने अनेक महत्वाचे निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर करून विराटने सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम आरसीबी

क्रिकेट चाहत्यांना आरसीबीच्या नवीन कर्णधाराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या दरम्यान, प्रसिद्ध समालोचक आणि माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी आरसीबीच्या नव्या कर्णधारासाठी तीन नावे सुचवली आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना मांजरेकर यांनी कायरण पोलार्ड, सूर्यकुमार यादव आणि डेव्हिड वॉर्नर या खेळाडूंनी आरसीबीचे नेतृत्व करावे, असा सल्ला दिला आहे. पोलार्ड हा नेतृत्वगुण असलेला माणूस आहे. त्यासोबत सूर्यकुमार यादव आणि डेव्हिड वॉर्नर हे माझ्या मते तीन दावेदार आहेत.

सूर्यकुमारने कधीच आयपीएल संघाचे नेतृत्व केले नाही, पण काही वर्ष तो गौतम गंभीर सोबत कोलकाता नाईट रायडर्समध्ये उपकर्णधार होता. तो आता मुंबई इंडियन्समधील महत्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणारा पोलार्ड सध्या उपकर्णधार आहे. मुंबई इंडियन्स त्यांच्या खेळाडूंना इतक्या सहजतेने इतर कोणत्याही फ्रँचायझीमध्ये जाऊ देणार नाही.

डेव्हिड वॉर्नर सध्या सनरायझर्स हैदराबादकडे आहे आणि त्याला हैदराबादचा संघ सोडू शकतो. वॉर्नर हा आयपीएल विजेता कर्णधार आहे आणि आरसीबीच नाही, तर कोणत्याही संघाचं नेतृत्व करण्यासाठी तो प्रबळ दावेदार असेल. सध्या तो आयपीएलमध्ये एका कठीण काळातून जात आहे, आयपीएलच्या पहिल्या हंगामात त्याला काढून टाकण्यात आलं होतं. यूएईत झालेल्या पहिल्या सामन्यातही डेव्हिड वॉर्नरला खातं उघडता आलेलं नाही. विराट या हंगामानंतर एक खेळाडू म्हणून आरसीबीसोबत कायम राहणार आहे. त्यामुळे कोहली पुढील हंगामापासून आयपीएलमध्ये एका नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू ए.बी. डिव्हिलियर्स कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहे. तसेच तरुण खेळाडू देवदत्त पडिक्कलही कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. या दोन्ही खेळाडूंना आरसीबीची फ्रँचायझी कायम ठेवणार की नाही, यावरच नवीन कर्णधाराचा निर्णय अवलंबून असेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज